शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वाशिम : जुन-जुलैमध्ये गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 11:13 IST

जुन ते जुलैदरम्यान पडणाऱ्या पावसाच्या एकूण सरासरीच्या तुलनेत ५७ टक्के पाऊस पडला आहे.

वाशिम : जिल्ह्यात वार्षिक सरासरी ८८५ मि.मी. पाऊस पडतो, तर १ जून ते ३१ जुलैदरम्यान सरासरी ४१० मि.मी. पाऊस पडतो. त्यात गतवर्षी याच कालावधित २९० मि.मी. पाऊस पडला होता. अर्थात गतवर्षी पावसाच्या सरासरीत २९.९३ टक्क्यांची तूट होती. यंदा मात्र जूनच्या सुरुवातीपासून दमदार पाऊस पडत असल्याने १ जून ते ३१ जुलैपर्यंत ५२४.६ मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ५७ टक्के असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यात दुप्पट वाढ झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडत आहे. जुन ते जुलैदरम्यान पडणाऱ्या पावसाच्या एकूण सरासरीच्या तुलनेत ५७ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे प्रकल्पातील पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा पावसाळ्यातील सुरुवातीच्या दोन महिन्यांत पडलेल्या पावसामुळे प्रकल्पांतील जलसाठा ५३.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांत मिळून ७७.६० टक्के साठा झाला आहे. त्यात वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पात ७० टक्के, मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पात १०० टक्के, तर कारंजा तालुक्यात आणि मानोरा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या अडाण प्रकल्पात ७३ टक्के जलसाठा झाला आहे. शिवाय जिल्ह्यातील १३१ लघू प्रकल्पांत मिळून सरासरी ४६.९० टक्के जलसाठा झाला आहे. तथापि, काही भागांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने लघू प्रकल्पांच्या पातळीत फारशी वाढ होऊ शकली नाही. त्यात ४३ प्रकल्पांची पातळी अद्यापही २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना संंबंधित परिसरात दमदार पाऊस पडण्याची प्रतिक्षा आहे. उर्वरित प्रकल्पांत मात्र ५० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा असल्याने या प्रककल्पांवर अवलंबून असलेल्या विविध पाणी पुरवठा योजना सुूरळीत चालण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

पाणी टंचाईचे सावट दूरगतवर्षीच्या अपुºया पावसामुळे यंदा पावसाळ्यापर्यंत जवळपास २५ गावांत पाणीटंचाईची समस्या कायम होती. या गावांत टँकरसह इतर उपाय योजना सुरू होत्या. तथापि, समाधानकारक पावसामुळे त्यातील जवळपायस २४ गावांतील पाणीटंचाईच्या उपाय योजना ३० जूनपर्यंतच बंद करण्यात आल्या, त्यानंतर मानोरा तालुक्यातील गलमगाव येथील विहीर अधिग्रहणाची योजनाही बंद करण्यात आली. जिल्ह्यातील प्रकल्पांची पातळी पाहता यंदा फारशी पाणीटंचाई जाणवणार नाही.

दुबार पेरणीचे संकटजिल्ह्यात यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे न उगवण्याचे प्रकार घडल्याने शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. बियाणे न उगवल्याच्या ४३३४ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. कृषी विभागाने तक्रारीनुसार शेतकºयांच्या शेताला भेटी देऊन पाहणी केली. त्यात ८९ तक्रारीत बियाणे सदोष आढळले आहेत.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसweatherहवामानAgriculture Sectorशेती क्षेत्रIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प