शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

वाशिम : जुन-जुलैमध्ये गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 11:13 IST

जुन ते जुलैदरम्यान पडणाऱ्या पावसाच्या एकूण सरासरीच्या तुलनेत ५७ टक्के पाऊस पडला आहे.

वाशिम : जिल्ह्यात वार्षिक सरासरी ८८५ मि.मी. पाऊस पडतो, तर १ जून ते ३१ जुलैदरम्यान सरासरी ४१० मि.मी. पाऊस पडतो. त्यात गतवर्षी याच कालावधित २९० मि.मी. पाऊस पडला होता. अर्थात गतवर्षी पावसाच्या सरासरीत २९.९३ टक्क्यांची तूट होती. यंदा मात्र जूनच्या सुरुवातीपासून दमदार पाऊस पडत असल्याने १ जून ते ३१ जुलैपर्यंत ५२४.६ मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ५७ टक्के असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यात दुप्पट वाढ झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडत आहे. जुन ते जुलैदरम्यान पडणाऱ्या पावसाच्या एकूण सरासरीच्या तुलनेत ५७ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे प्रकल्पातील पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा पावसाळ्यातील सुरुवातीच्या दोन महिन्यांत पडलेल्या पावसामुळे प्रकल्पांतील जलसाठा ५३.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांत मिळून ७७.६० टक्के साठा झाला आहे. त्यात वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पात ७० टक्के, मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पात १०० टक्के, तर कारंजा तालुक्यात आणि मानोरा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या अडाण प्रकल्पात ७३ टक्के जलसाठा झाला आहे. शिवाय जिल्ह्यातील १३१ लघू प्रकल्पांत मिळून सरासरी ४६.९० टक्के जलसाठा झाला आहे. तथापि, काही भागांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने लघू प्रकल्पांच्या पातळीत फारशी वाढ होऊ शकली नाही. त्यात ४३ प्रकल्पांची पातळी अद्यापही २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना संंबंधित परिसरात दमदार पाऊस पडण्याची प्रतिक्षा आहे. उर्वरित प्रकल्पांत मात्र ५० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा असल्याने या प्रककल्पांवर अवलंबून असलेल्या विविध पाणी पुरवठा योजना सुूरळीत चालण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

पाणी टंचाईचे सावट दूरगतवर्षीच्या अपुºया पावसामुळे यंदा पावसाळ्यापर्यंत जवळपास २५ गावांत पाणीटंचाईची समस्या कायम होती. या गावांत टँकरसह इतर उपाय योजना सुरू होत्या. तथापि, समाधानकारक पावसामुळे त्यातील जवळपायस २४ गावांतील पाणीटंचाईच्या उपाय योजना ३० जूनपर्यंतच बंद करण्यात आल्या, त्यानंतर मानोरा तालुक्यातील गलमगाव येथील विहीर अधिग्रहणाची योजनाही बंद करण्यात आली. जिल्ह्यातील प्रकल्पांची पातळी पाहता यंदा फारशी पाणीटंचाई जाणवणार नाही.

दुबार पेरणीचे संकटजिल्ह्यात यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे न उगवण्याचे प्रकार घडल्याने शेतकºयांना दुबार पेरणी करावी लागली. बियाणे न उगवल्याच्या ४३३४ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. कृषी विभागाने तक्रारीनुसार शेतकºयांच्या शेताला भेटी देऊन पाहणी केली. त्यात ८९ तक्रारीत बियाणे सदोष आढळले आहेत.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसweatherहवामानAgriculture Sectorशेती क्षेत्रIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प