शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

सुजलाम, सुफलाम अभियानातील ४६ शेततळ्यांचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 3:21 PM

कामे बंद पडल्याने अभियानाचा उद्देश असफल ठरला असून, ही कामे पूर्ण करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जलसंधारण विभाग, जिल्हा प्रशासन आणि भारतीय जैन संघटनेमार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम वाशिम अभियानांतर्गत जिल्ह्यात पाच तालुक्यात मिळून ४७ शेततळी, तर एका तालुक्यात २ वनतळे मिळून एकूण ३९ तळ्यांची कामे वर्षभरापूर्वी प्रस्तावित करण्यात आली होती. प्रत्यक्षात यातील केवळ वाशिम तालुक्यातील चिखली येथील शेततकळ्याचे काम पूर्णत्वास गेले असून, परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना सिंचनासाठी त्याचा आधार होत आहे. तथापि, इतर कामे बंद पडल्याने अभियानाचा उद्देश असफल ठरला असून, ही कामे पूर्ण करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.दुष्काळी परिस्थितीवर मात करणे आणि पावसाचा प्रत्येक थेंब जागेवरच अडविण्यासाठी, जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाच्या विविध कामांना प्राधान्य दिले जात आहे. वाशिम जिल्ह्यात जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेच्या पुढाकारातून गतवर्षी ‘सुजलाम सुफलाम वाशिम जिल्हा’ अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत १८ गावांत जलसंधारणाची शेकडो कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यात जिल्ह्यात सहा तालुक्यांत मिळून एकूण ४७ शेततळे आणि २ वनतळे जेसीबी मशीनच्या आधारे खोदली जाणार होती. यात शंभर चौरस लांबी-रुंदी आणि ३ मीटर खोल असे ४६, तर शंभर चौरस मीटर लांबी-रुंदी आणि ४ मीटर खोल अशा आकाराच्या शेततळ्यांचा समावेश होता. तथापि, विविध तांत्रिक अडचणी आणि वाढत्या इंधन खर्चामुळे केवळ एक शेततळे वगळता इतर सर्व बंद पडली. त्यातही मानोरा तालुक्यातील इंझोरी, मंगरुळपीर तालुक्यातील चांभईसह इतर एक आणि कारंजा तालुक्यातील एक शेततळे अर्ध्यावर खोदून बंद करण्यात आले. या कामांसाठी भारतीय जैन संघटनेकडून जेसीबी आणि पोकलन मशीनही उपलब्ध करण्यात आल्या होत्या; परंतु शासनाकडून निर्धारित दरापेक्षा अधिक इंधन खर्चासह इतर अडचणींमुळे ही कामे बंद पडल्याने उद्देश असफल ठरला.

पर्यायी उपाय हवेतसुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत प्रस्तावित शेततळ्यांचे काम प्रामुख्याने निर्धारित दरापेक्षा अधिक इंधन खर्च होत असल्यानेच बंद पडली आहेत. आता ही कामे पूर्ण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासह इतर उपायांची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती