शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

पपईची मातीमोल भावात विक्री

By admin | Updated: March 20, 2015 00:56 IST

३ रूपये किलोनेही ग्राहक येईना; मंगरूळपीर तालुक्यातील फळउत्पादक शेतकरी त्रस्त.

मंगरूळपीर (जि. वाशिम): उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे व नुकत्याच झालेल्या गारपीटमुळे पपईचे दर १२ रूपयावरून प्रति किलो ३ रूपये पर्यंंत आल्याने तालुक्यातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पपई लागवडीसाठी जिल्हय़ात मंगरूळपीर तालुका आघाडीवर आहे.या तालुक्यातील शेतकर्‍यांनी अनेक प्रकारचे प्रयोग आपल्या शेतात करून यशस्वी झाले आहे. परंतु मागील एक दोन वर्षांंपासुन निर्सगाच्या अवकृपेमुळे फळ उत्पादक बळीराजा अस्मानी संकटात सापडुन कर्जबजारी होत आहे. तालुक्यात जवळपास सर्वच प्रकारच्या फळबागा आहेत.उन्हाळय़ात फळबागाचा फायदा होईल या आशेने पपई, खरबुज, टरबुज लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना वादळी पाऊस व गारपीटचा जबर फटका बसला आहे. शिवाय पंधरा दिवसांपासुन बदलेल्या वातावरणामुळे फळाची मागणी कमी झाली व्यापारी सुध्दा दिसेनासे झाले आहेत त्यामुळे पपई उत्पादक शेतकरी आर्थीक संकटात सापडले आहेत. अचानक उत्तर भारतात गारवा निर्माण झाल्याने उन्हाळी फळांची मागणीत घट झाली असल्याने पपईच्या बागेत फळे पिकुन खाली पडत आहे. परिणामी शेतकर्‍यांना डोळे पांढरे करण्याची वेळ आली आहे. निर्सगाच्या मार्‍याला हैराण झालेल्या बळीराजाना आधार देण्यासाठी शासनाने पुढे यावे अशी मागणी फळ उत्पादक शेतकरी करित आहे.