शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

‘जलदूत’ करणार पाण्याच्या वापराविषयी जनजागृती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 4:11 PM

जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर १२ असे एकूण ६० जलदुतांची निवड केली जाणार असून, २१ मे पर्यंत इच्छूक उमेदवारांकडून जिल्हा प्रशासनातर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपाण्याचा वापर काटकसरीने व नियोजनपुर्वक कसा करावा, यासंदर्भात जलदुतांमार्फत जनजागृती केली जाणार आहे. तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यात १२ जलदूतांची निवड केली जाणार आहे.   जलदूत पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवाशी असावा व किमान १२ वी किंवा पदविका उत्तीर्ण असावा.

वाशिम : वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग व अनियमित पर्जन्यमान यामुळे भविष्यात उपलब्ध पाण्यावरील ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणी सर्व वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेच्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी पाण्याचा वापर काटकसरीने व नियोजनपुर्वक कसा करावा, यासंदर्भात जलदुतांमार्फत जनजागृती केली जाणार आहे. यासाठी वाशिम जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर १२ असे एकूण ६० जलदुतांची निवड केली जाणार असून, २१ मे पर्यंत इच्छूक उमेदवारांकडून जिल्हा प्रशासनातर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत.

विविध कारणांमुळे उपलब्ध पाण्याची कमतरता जाणवत आहे. समाजात जलजागृती व जलसाक्षरता निर्माण होण्याची गरज असून, वाशिम जिल्ह्यात तालुका स्तरावरील जलदूतांची निवड करून जनजागृती केली जाणार आहे. तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यात १२ जलदूतांची निवड केली जाणार आहे.  जलदूत पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा संबंधित तालुक्याचा रहिवाशी असावा व किमान १२ वी किंवा पदविका उत्तीर्ण असावा. संगणकीय ज्ञान आवश्यक. तसेच प्रवास, सुक्ष्म निरिक्षण व निरिक्षणाचे विश्लेषन तसेच निष्कर्षात्मक मांडणी करण्याची आवड व कौशल्य असावे. जलविषयक शासकीय, अशासकीय किंवा समाजसेवी संस्थांशी संबंधित प्रशिक्षक असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. जलसंधारणाबाबत पुरेसे ज्ञान असावे. निवडीमध्ये महिलांनादेखील प्राधान्य दिले जाईल. अर्ज करण्यासंदर्भात अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जलसंपदा विभागाने कळविले.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी