शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:45 IST

वाशिम : कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्याच धर्तीवर महाविद्यालयेदेखील सुरू ...

वाशिम : कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्याच धर्तीवर महाविद्यालयेदेखील सुरू करावी, असा सूर प्राचार्यांसह विद्यार्थ्यांमधून उमटत आहे.

कोरोनामुळे गतवर्षातील मार्च महिन्यापासून शिक्षणक्षेत्र प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. यंदाही २६ जूनपासून प्रत्यक्ष शिक्षणासाठी शाळा सुरू झाल्या नाहीत. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होऊ शकतात, मग महाविद्यालये का नाही? असा प्रश्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

००००००००००००

जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये २७

०००००००

एकूण विद्यार्थीसंख्या २२३८०

००००००००

शाखानिहाय विद्यार्थीसंख्या

विज्ञान ८७०४

वाणिज्य १७९०

कला ११८८६

००००००००००००

प्राचार्यांची तयारी

कोट

कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. याच धर्तीवर वरिष्ठ स्तरावर महाविद्यालयेदेखील सुरू करण्याचे नियोजन होणे अपेक्षित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी हे कोरोनाविषयक नियमांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकतात. महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी मिळाली तर निश्चितच प्रभावी नियोजन केले जाईल.

- डॉ. मीलनकुमार संचेती, प्राचार्य

००००००००

कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याने महाविद्यालयेदेखील सुरू होणे अपेक्षित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे खबरदारी घेऊ शकतात. महाविद्यालय प्रशासनदेखील योग्य ती खबरदारी घेते. परवानगी मिळाली तर संपूर्ण तयारी केली जाईल.

- जी. एस. कुबडे, प्राचार्य

०००००००

महाविद्यालये सुरू होण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

कोट

आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होऊ शकतात, मग महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. योग्य ती खबरदारी घेऊन महाविद्यालयेदेखील सुरू करायला हवी. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

- गौरव गायकवाड, विद्यार्थी

०००००००००००

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन शासनस्तरावर होणे अपेक्षित आहे. ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन शिक्षण यामध्ये खूप फरक आहे. महाविद्यालयात प्रत्यक्ष शिक्षण मिळणे आवश्यक ठरत आहे.

- हर्षल गव्हांदे, विद्यार्थी