शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे उद्यापासून बारावे वर्षे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:23 PM

वाशिम : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे बारावे वर्ष १५ आॅगस्ट २०१८ पासून सुरु होत असून सर्व ग्राम पंचायतींनी १५ ते ३० आॅगस्ट २०१८ या कालावधीमध्ये ग्रामसभा आयोजित करुन तंटामुक्त गाव समिती स्थापन करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.

ठळक मुद्देगावाची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविली जात आहेसन २०१८-१९ या वर्षातील तंटामुक्त गाव समितीचे कामकाजाला १५ आॅगस्टपासून सुरूवात होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे बारावे वर्ष १५ आॅगस्ट २०१८ पासून सुरु होत असून सर्व ग्राम पंचायतींनी १५ ते ३० आॅगस्ट २०१८ या कालावधीमध्ये ग्रामसभा आयोजित करुन तंटामुक्त गाव समिती स्थापन करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.गावाची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविली जात आहे. तंटामुक्त गाव समितीने गावामध्ये जातीय व धार्मिक सलोखा, सामाजिक व राजकीय सामंजस्य आणि अनिष्ठ प्रथांचे निर्मुलन करण्यासाठी गाव पातळीवर विविध उपक्रम राबविणे अपेक्षीत आहे. एक गाव-एक गणपती, गणेशोत्सव व गणपती विसर्जन मिरवणूक विना पोलीस बंदोबस्तात करणे, अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे, अनिष्ठ चालीरीती, परंपरांना प्रतिबंध करणे, गावामध्ये संपुर्ण दारुबंदी करणे, गावामध्ये विविध उत्सवांमधून समाजोपयोगी उपक्रम राबविणे, गावामध्ये ग्रामसुरक्षा दल स्थापन करुन रात्रीगस्त सुरु ठेवणे, वनसंवर्धन व वन संरक्षणाकरीता प्रयत्न करणे, गावपातळीवर घेण्यात येणाऱ्या विविध निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी व बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणे, आदी उपक्रम समितीमार्फत राबविले जातात. सन २०१८-१९ या वर्षातील तंटामुक्त गाव समितीचे कामकाजाला १५ आॅगस्टपासून सुरूवात होत आहे. १५ आॅगस्ट ते ३० आॅगस्टदरम्यान ग्रामसभेतून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती स्थापन करावी लागणार आहे. तंटामुक्त गाव समितींना आपले अध्यक्ष, सदस्य बदलावयाचे असल्यास त्यांनी याच कालावधीमध्ये हा बदल करावा, असे अशा सूचना पोलीस विभागाने दिल्या. एक तृतीयांशपेक्षा जास्त समिती सदस्य बदलू नयेत. मोहिमेमध्ये सहभाग घेतल्याबाबतचा ठराव व समितीचे अध्यक्ष, सदस्य यांचे नावाची यादी संबंधीत पोलीस स्टेशनला १ सप्टेंबर २०१८ पूर्वी सादर करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले.तंटामुक्त गाव समितीने गावामधील दाखल असलेल्या दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर तंट्याची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत गोळा करावी. समितीतर्फे ग्रामस्थांना आवाहन करुन त्यांचेकडील तंटे, त्यांच्यातील वाद याबाबत माहिती मागवावी. समितीस सुयोग्य वाटेल त्या पध्दतीने व आवश्यकतेनुसार घरोघरी जावून समिती माहिती गोळा करेल, त्याचबरोबर संबंधीत पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय व न्यायालय यांचेकडून प्रलंबीत असलेल्या तंट्याची माहिती घेऊन तंटे मिटविण्याकरीता प्रयत्न करावा, असे आवाहनही पोलीस विभागाने केले.

 

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस