शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जोडणीअभावी सौर पंपाचे साहित्य सात महिन्यांपासून धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:56 IST

महावितरणच्या धोरणानुसार वरूड तोफा येथील शेतकरी संतोष भगवानदास अग्रवाल यांनी सौरऊर्जा कृषी पंप जोडणीसाठी २७ जून २०१९ रोजी नामांकित ...

महावितरणच्या धोरणानुसार वरूड तोफा येथील शेतकरी संतोष भगवानदास अग्रवाल यांनी सौरऊर्जा कृषी पंप जोडणीसाठी २७ जून २०१९ रोजी नामांकित कंपनीच्या सौर कृषी पंपाची निवड करून २४ हजार ७१० रुपयांची रक्कम भरली. त्यानुसार संबंधित कंपनीने ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या शेतात कृषी पंपाचे साहित्य पोहोचवून दिले. मात्र, सात महिने उलटले तरी या कृषी पंपाची जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे सौर कृषी पंपाचे साहित्य त्यांच्या शेतात धूळखात पडले आहे. त्यातच सौर कृषी पंपाची जोडणी रखडल्याने सिंचनाअभावी उत्पादनावरही परिणाम होत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ते याबाबत महावितरण कंपनीचे अधिकारी तसेच संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधत असतानाही त्यांची समस्या सोडविण्याची तसदी आजवर घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर करून याची दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच शेतात धूळखात पडलेले सौरपंपाचे साहित्य चोरीस जाण्याची भीतीही त्यांनी वर्तविली असून, या नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी महावितरण व सौरऊर्जा कंपनीवर राहील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.