शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

खैरखेडा येथील पाणीटंचाईची उपअभियंत्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:39 IST

गेल्या दोन महिन्यापासून खैरखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हात रोजगार बुडवून आबालवृद्धांना पाण्यासाठी दोन किमी अंतरावर भटकंती ...

गेल्या दोन महिन्यापासून खैरखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हात रोजगार बुडवून आबालवृद्धांना पाण्यासाठी दोन किमी अंतरावर भटकंती करावी लागत आहे. डोईवर पाण्याचे हंडे घेऊन घाटरस्ता चढताना वयोवृद्ध व महिला वर्गाला अत्यंत त्रास सहन करावा लागतो. जलस्वराज्यची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी दाहीदिशा रानोमाळ भटकंती करूनही शुद्ध पाणी मिळत नसल्याने दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. प्रशासनाने डव्हा गावानजीकच्या चाकातीर्थ संग्राहक तलावातून अथवा सुदी गावाजवळील संग्राहक तलावातून पाणी पुरवठ्याची व्यवस्था केल्यास निश्चितच येथील जनतेची कायमस्वरूपी पाणी समस्या निकाली निघू शकते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, उपअभियंता मुकुंदराज आंधळे यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. सद्यस्थितीत टॅंकरद्वारा तात्काळ पाणीपुरवठा करण्याची मागणी खैरखेडा ग्रामस्थांमधून होत आहे.

..

कोट

खैरखेडा येथील पाणी समस्येची पाहणी केली आहे. कायमस्वरूपी समस्या निकाली काढण्यासाठीच्या उपाययोजनेबाबत ग्रामस्थांशी चर्चा सुद्धा केली आहे. याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल.

- मुकुंदराज आंधळे,

उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग