शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

कोरोना लस घेण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:17 PM

Corona Vaccine News अनेक कर्मचाऱ्यांमध्ये घबराहट असल्याने गेल्या ७ दिवसांत केवळ ९०० कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी शनिवार, १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत ५ हजार ५५० ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ यांना लस दिली जात आहे; मात्र लस घेण्याबाबत अनेक कर्मचाऱ्यांमध्ये घबराहट असल्याने गेल्या ७ दिवसांत केवळ ९०० कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे; तर ४ हजार ६५० कर्मचारी अद्याप बाकी आहेत. दरम्यान, लस सुरक्षित असल्याबाबत आरोग्य विभागाकडून युद्धस्तरावर जनजागृती करण्यात येत असून उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोविड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोणताही सक्षम पर्याय नसल्याने देशात जवळपास दीड कोटी लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. वाशिम जिल्ह्यातही सुमारे ७ हजार नागरिक या विषाणूने बाधित झाले असून १५२ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विषाणूच्या संसर्गाचा वेग काहीसा मंदावला असला तरी धोका पूर्णत: टळलेला नाही. त्यामुळे संसर्गापासून बचाव करणारी लस देण्याची मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना कोरोना बाधितांवर उपचार करताना विषाणू संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर आणि कारंजा येथील केंद्रांवर ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ यांना ही लस दिली जात आहे. याअंतर्गत शासकीय आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रातील एकूण ५ हजार ५५० कर्मचाऱ्यांची जिल्हा आरोग्य विभागाने नोंद केली होती. त्यातील केवळ ९०० जणांनीच आतापर्यंत ही लस घेतली असून तब्बल ४ हजार ६५० कर्मचाऱ्यांनी लस घेण्याबाबत तयारी दर्शविलेली नाही. दरम्यान, लस सुरक्षित असून घाबरण्याचे कुठलेच कारण नसल्याचे सांगत जिल्हा आरोग्य विभागाकडून यासंबंधील युद्धस्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी न भिता लस घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

रिॲक्शन काय?कोरोनाची लस घेतल्याच्या काही तासानंतर अंगाला ताप येऊन अंगदुखी जाणवते. यामुळे थकवा येतो. असे असले तरी ही रिॲक्शन फार काळ राहत नाही. काही वेळेनंतर व्यक्ती पुर्वीप्रमाणेच वावरायला लागतो, असे अनुभव अनेक कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविले.

 

कोरोना लसीविषयी सध्या सोशल मीडियातून काही नकारात्मक संदेश प्रसारित केले जात आहेत. असे संदेश अर्धवट माहितीच्या आधारे पाठवले जातात. कोरोनाची लस पूर्णत: सुरक्षित आहे, त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट जाणवला नाही. - डॉ. अविश दरेकार आयुष अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, कारंजा

लसीकरणानंतर १५ ते १६ तासांनंतर अंगात काहीसा ताप जाणवला. लस टोचून घेतल्यानंतर अशी काही सौम्य लक्षणे दिसू शकतील, याची मला जाणीव होती. काही तासांनंतर ताप कमी झाला. त्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही.  - विद्या किसनराव भुसारे परिचारिका, उपजिल्हा रुग्णालय, कारंजा

कोरोनाची लस सर्वच बाबतीत सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर तत्काळ काहीच त्रास जाणवला नाही. १२ तासानंतर मात्र थोडासा ताप, अंगदुखी जाणवली. मात्र, ही काही गंभीर बाब नाही. लस शरीरात गेल्यानंतर तिचे ‘इम्यूनाइजेशन’ होताना अशी लक्षणे दिसणे साहजिक आहे. आता ताप, अंगदुखी कमी झाली असून इतर कोणताही गंभीर त्रास जाणवला नाही. - आरती अतुल ताठेआैषध निर्माण अधिकारी, पोहा

वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्सेस तसेच इतर स्टाफने सोशल मीडियातून पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. त्यापेक्षा प्रत्यक्ष लस घेतलेले वरिष्ठ डॉक्टर, सहकाऱ्यांशी चर्चा करून संभ्रम दूर करावा. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लस टोचून घेणे आवश्यक आहे. मीसुद्धा लस घेतली असून कुठलाही त्रास जाणवलेला नाही. - डॉ. अविनाश आहेर जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसwashimवाशिम