शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

वाशिम जिल्ह्यातील टंचाईग्रस्त २५ गावांना टँकरची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 5:34 PM

वाशिम: २०१७ मधील पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ५१० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आतापर्यंत ४८ टँकर सुरू केले असून, अद्याप जवळपास २५ गावांत टँकरची प्रतीक्षा आहे.  

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण ४९१ विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित आहे. उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आतापर्यंत ४८ टँकर सुरू केले.अद्याप जवळपास २५ गावांत टँकरची प्रतीक्षा आहे.  

वाशिम: २०१७ मधील पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने वाशिम जिल्ह्यातील ५१० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने आतापर्यंत ४८ टँकर सुरू केले असून, अद्याप जवळपास २५ गावांत टँकरची प्रतीक्षा आहे.  

गतवर्षी पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही तसेच पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्प आणि भूजल पातळीतही समाधानकारक वाढ होऊ शकली नव्हती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक गावांत पाणीेटंचाई निर्माण झाली. पाणीटंचाईग्रस्त गावांत उपाययोजनेचा एक भाग म्हणून विहिर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, तात्पुरती नळ योजना यासंदर्भात दिरंगाई करू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. तथापि, पाणीटंचाईचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरच काही दिवस धूळखात पडत असल्याने संबंधित गावांत टँकर सुरू झाले नाहीत. विहिर अधिग्रहण करण्याचा वेग मात्र त्या तुलनेत अधिक आहे. जिल्ह्यात एकूण ४९१ विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित आहे. विहिर अधिग्रहीत केल्यानंतर तेथे ‘अधिग्रहित विहिर’ असा फलक लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावरून टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसात प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, अशी मागणी सरपंच संघटनेचे वाशिम तालुकाध्यक्ष दीपक खडसे यांनी बुधवारी केली. टँकरचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याची मागणीही खडसे यांनी केली.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी