शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कारंजातून २५ लाख रुपये किमतीचा १०० किलो गांजा जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 17:37 IST

गुन्हे शाखेच्या पथकाने २५ लाख रुपये किमतीचा १०० किलो ३५० ग्राम गांजा जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील कारंजा येथून शेलुबाजारकडे जाणारे वाहन अडवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ लाख रुपये किमतीचा १०० किलो ३५० ग्राम गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवार, २ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा करण्यात आली.नागपूरवरून पुणे येथे काही इसम एम.एच. २९ आर. ७४२० आणि एम.एच. ०३ बी.जे. ७४०६ या दोन वाहनांव्दारे गांजा घेऊन जाणार असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी तीन वेगवेगळे पथक तयार करून कारंजा ते शेलुबाजार रस्त्यावरील कोळी फाट्यानजिक सापळा रचून सदर वाहनांवर पाळत ठेवली. दरम्यान, रात्री १०.३० वाजताच्या सुमारास दोन्ही वाहने निदर्शनास येताच त्यांना थांबवून पंचासमक्ष झाडाझडती घेण्यात आली असता, वाहनांमध्ये १०० किलो ३५० ग्राम गांजा (किंमत २५ लाख ८ हजार ७५० रुपये) आढळून आला. यासह ९ मोबाईल फोन, इनोव्हा कंपनीची गाडी, आय २० कंपनीची गाडी व रोख रक्कम असा एकंदरित ४३ लाख २८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी आशुतोष गायकवाड, विजय शिंदे, प्रितेश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, महेश पगडे (सर्व रा. मुखई, ता. शिरूर, जि. पुणे) आणि यश पवार (रा. जातेगाव बु. ता. शिरूर, जि. पुणे) अशा सहा जणांवर कारंजा शहर पोलिस स्टेशन येथे अंमली औषधीद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम २० व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाCrime Newsगुन्हेगारी