शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पाण्यासाठी बिवलपाड्यातील महिला गुजरात राज्यात, प्रश्न सोडवेल त्यालाच मत देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:03 IST

मोखाडा तालुक्यातील बिवलपाड्याची स्थितीही बिकट असून गुजरात व महाराष्टÑ सीमेवरील या वस्तीवरील महिला पाच किमी अंतरावरील नदीपात्रामध्ये खड्डे करुन आपली तहाण भागवित आहेत.

- रविंद्र साळवेमोखाडा - तालुक्यातील बिवलपाड्याची स्थितीही बिकट असून गुजरात व महाराष्टÑ सीमेवरील या वस्तीवरील महिला पाच किमी अंतरावरील नदीपात्रामध्ये खड्डे करुन आपली तहाण भागवित आहेत. तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रु प धारण केले असुन ५० गावपाड्यांना पाण्याचा टँकरने पुरवठा होत आहे.नदीपात्रातील या खड्ड्यातुन पाणी भरायचे म्हणजे दिवसभर कामधंद्यावर न जाता पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. आमच्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीचें दुर्लक्ष निवडणुकीत मत मागायला आल्यावर जो पक्ष आमचा पाण्याचा प्रश्न सोडवेल त्यांनाच आम्ही मतदान करू असे मत अनिता वाजे या तरु णीने लोकमतशी बोलताना सांगितले.बिवलपाडा हे अतिदुर्गम आणि डोंगर-दरी च्या कुशीत वसलेले शतप्रतिशत आदिवासी लोकवस्तीचे गाव आहे. या गावाच्या दोन्ही बाजुने नदीचे पाणी असुन उर्विरत दोन बाजुने डोंगर असल्याने येथील जनता आजही विकासापासुन वंचित आहेत. या गावाची लोकसंख्या १९० च्या जवळपास असुन ३५ घरांची लोकवस्ती आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही किमान मुलभुत सुविधांना सुद्धा येथील जनता वंचित आहे. पाणी टंचाई येथील कायमची समस्या असून निमृलनासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या निधीतुन विहिरी बांधल्या आहेत. मात्र, त्या बांधताना जमीनीचा पोत व पाण्याच्या उपलब्धते विषयी शास्त्रीय परिक्षण न झाल्याने त्यांत एक थेंबही पाणी नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे झालेला लाखो रुपये खर्च ठेकेदारांच्या खिशात गेला आहे.रोजगार कागदावर; रस्तेही मातीचेगेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला रोजगार हमीची काम मिळत नसल्याने आम्ही दरवर्षी स्थलांतरित होतो असे ही लहू वाजे यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागा कडून करण्यात आलेला डांबरीकरण रस्ता धामोडी गावाच्या पुढे बिवलपाडयाला पोहचण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर अंतरावर अर्धवट असल्याने गावात गाडी येऊ शकत नाही.दोन वर्षांपूर्वी एम.आर.जी.एस योजने अंतर्गत मातीचा भराव टाकुन करण्यात आलेला रस्ता पावसाच्या पाण्याने दरवर्षीच वाहुन जात असल्याने या गावात जाण्यासाठी जंगलातील पायवाटेचा आधार घ्यावा लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदीप राऊत यांनी सांगितले.बिवलपाडा गावाची काय स्थिती आहे याबाबत आदेश देऊन पहाणी करण्यात येईल. तसेच, त्याठिकाणी रोजगार हमीचे कामे का उपलब्ध केली जात नाही याचीही विचारणा करणार आहे. कोरड्या विहिरींची पहाणी करुन निधीचा अपव्यय केला असेल तर त्याची चौकशी करू!- मिलिंद बोरीकर, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प. पालघरडोली बांधून होते रुग्णसेवाबिवलपाड्यासाठी आरोग्यसेवा फक्त कागदावर असून गावकरी लहू वाजे यांनी सांगितले की, गावात जर एखादा व्यक्ती जास्तच आजारी असल्यास रात्रीच्या वेळी सर्व गावकरी चादरीची डोली बांधुन रुग्णाला दहा किलोमीटर अंतरावरील आसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेतात.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ