शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी बिवलपाड्यातील महिला गुजरात राज्यात, प्रश्न सोडवेल त्यालाच मत देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 04:03 IST

मोखाडा तालुक्यातील बिवलपाड्याची स्थितीही बिकट असून गुजरात व महाराष्टÑ सीमेवरील या वस्तीवरील महिला पाच किमी अंतरावरील नदीपात्रामध्ये खड्डे करुन आपली तहाण भागवित आहेत.

- रविंद्र साळवेमोखाडा - तालुक्यातील बिवलपाड्याची स्थितीही बिकट असून गुजरात व महाराष्टÑ सीमेवरील या वस्तीवरील महिला पाच किमी अंतरावरील नदीपात्रामध्ये खड्डे करुन आपली तहाण भागवित आहेत. तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रु प धारण केले असुन ५० गावपाड्यांना पाण्याचा टँकरने पुरवठा होत आहे.नदीपात्रातील या खड्ड्यातुन पाणी भरायचे म्हणजे दिवसभर कामधंद्यावर न जाता पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. आमच्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीचें दुर्लक्ष निवडणुकीत मत मागायला आल्यावर जो पक्ष आमचा पाण्याचा प्रश्न सोडवेल त्यांनाच आम्ही मतदान करू असे मत अनिता वाजे या तरु णीने लोकमतशी बोलताना सांगितले.बिवलपाडा हे अतिदुर्गम आणि डोंगर-दरी च्या कुशीत वसलेले शतप्रतिशत आदिवासी लोकवस्तीचे गाव आहे. या गावाच्या दोन्ही बाजुने नदीचे पाणी असुन उर्विरत दोन बाजुने डोंगर असल्याने येथील जनता आजही विकासापासुन वंचित आहेत. या गावाची लोकसंख्या १९० च्या जवळपास असुन ३५ घरांची लोकवस्ती आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतरही किमान मुलभुत सुविधांना सुद्धा येथील जनता वंचित आहे. पाणी टंचाई येथील कायमची समस्या असून निमृलनासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या निधीतुन विहिरी बांधल्या आहेत. मात्र, त्या बांधताना जमीनीचा पोत व पाण्याच्या उपलब्धते विषयी शास्त्रीय परिक्षण न झाल्याने त्यांत एक थेंबही पाणी नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे झालेला लाखो रुपये खर्च ठेकेदारांच्या खिशात गेला आहे.रोजगार कागदावर; रस्तेही मातीचेगेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला रोजगार हमीची काम मिळत नसल्याने आम्ही दरवर्षी स्थलांतरित होतो असे ही लहू वाजे यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागा कडून करण्यात आलेला डांबरीकरण रस्ता धामोडी गावाच्या पुढे बिवलपाडयाला पोहचण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर अंतरावर अर्धवट असल्याने गावात गाडी येऊ शकत नाही.दोन वर्षांपूर्वी एम.आर.जी.एस योजने अंतर्गत मातीचा भराव टाकुन करण्यात आलेला रस्ता पावसाच्या पाण्याने दरवर्षीच वाहुन जात असल्याने या गावात जाण्यासाठी जंगलातील पायवाटेचा आधार घ्यावा लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदीप राऊत यांनी सांगितले.बिवलपाडा गावाची काय स्थिती आहे याबाबत आदेश देऊन पहाणी करण्यात येईल. तसेच, त्याठिकाणी रोजगार हमीचे कामे का उपलब्ध केली जात नाही याचीही विचारणा करणार आहे. कोरड्या विहिरींची पहाणी करुन निधीचा अपव्यय केला असेल तर त्याची चौकशी करू!- मिलिंद बोरीकर, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प. पालघरडोली बांधून होते रुग्णसेवाबिवलपाड्यासाठी आरोग्यसेवा फक्त कागदावर असून गावकरी लहू वाजे यांनी सांगितले की, गावात जर एखादा व्यक्ती जास्तच आजारी असल्यास रात्रीच्या वेळी सर्व गावकरी चादरीची डोली बांधुन रुग्णाला दहा किलोमीटर अंतरावरील आसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेतात.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ