शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

डहाणू विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व कोणाचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 12:33 AM

थेट लढत : विविध प्रकल्पांमुळे नाराज मतदारांचा मोठा वर्ग; मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे आव्हान

- अनिरुद्ध पाटीललोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : डहाणू विधानसभा मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत भाजपचे पास्कल धनारे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांच्यात असून ती लढत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांच्या शिदोरीवर धनारे यांनी प्रचाराला भर दिला आहे. तर विविध प्रकल्पांमुळे भूमिपुत्रांना विस्थापित होण्याचा मुद्दा माकपच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडत आहे.

या मतदारसंघ डहाणू आणि ालासरी तालुक्यात विभागला असून मुख्यत्वे सागरी, डोंगरी व शहरी ते तीन भाग आहेत. विविध पक्षाचे दहा उमेदवार रिंगणात असून त्यापैकी रमेश मलावकर आणि विनोद निकोले वगळता उर्वरित तलासरी तालुक्यातील आहेत. धनारे यांच्याप्रमाणेच पक्षातील अन्य चार उमेदवार इच्छुक होते, त्यापैकी मलावाकरांचे बंड शमले आहे. आता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने प्रचारात रंगत आली आहे. शहरी भागातील प्रचारावर भाजपचा चांगला प्रभाव आहे. मात्र सेनेकडून मिळणारा प्रतिसाद कमी आहे.

विशेषत: नरेंद्र मोदींनी राबवलेली विविध विकासकामे आणि योजनेवर प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा वगळता अन्य मोठे नेते आलेले नाहीत. शिवाय त्यांनी वाढवण बंदराबाबत बोलणं टाळल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. पालघर विधानसभा क्षेत्रांतर्गत वाढवणचा अंतर्भाव असला तरी हे गाव डहाणू तालुक्यातील असल्याने डहाणूकर बंदर उभारणी विरोधात आहेत. डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरण हटविण्याच्या हालचालींमुळे येथील पर्यावरणप्रेमी व बागायतदार नाराज आहेत. मागील पाच वर्षातील विकासकामांबाबत धनारे निष्क्रि य राहिल्याची मतदारांची धारणा आहे.

डहाणू मतदारसंघाची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यात आली तेव्हापासूनच विनोद निकोले यांचे नाव चर्चेत होते. त्यामुळे पक्षांतर्गत बंडाळीचा प्रश्न आला नाही. या पक्षाचे केंद्रीय नेतृत्व सीताराम येचुरी प्रचारसभेत आले, त्यावेळी महाआघाडीतील सर्वच पक्षांनी सहभाग घेतला. विविध प्रकल्पांच्या मुद्द्याचा वापर माकप करत आहेत.भाजप आणि माकप या दोन्ही पक्षांकडून प्रचारसभा, तर पाड्यापाड्यावर जाऊन गृहभेट घेण्यावर जोर दिला जात आहे. येथील मतदारांमध्ये मजूरवर्गाची संख्या अधिक असल्याने सायंकाळ ते रात्र हा काळ निवडला जातो. आॅक्टोबर हीटमुळे हैराण प्रचारकांनाही उन्हामुळे दिलासा मिळतो. दरम्यान मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून महाराष्ट्रातील विविध बंदरांसह गुजरात आणि गोव्यातील बंदरांवर गेलेल्यांचा आकडा हजारोंच्या घरात असल्याने त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो. प्रकल्प, बंदर आणि प्राधिकरण हटवण्यावरून बहिष्काराच्या भूमिकेत असलेल्या नागरिकांना कोणतेही आश्वासन सत्ताधारी अथवा प्रशासनाने दिलेले नाही. तर सध्या भात कापणीची कामे सुरू असल्याने मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाताना सर्वच पक्षांची कसोटी लागणार आहे.