शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

पालघरचे हजारो खलाशी गुजरात बंदरात अडकले; कुटुंबापासून दुरावल्याची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 1:04 AM

बंदराकडे एकाच वेळी अनेक बोटी येऊ लागल्याने त्या उभ्या करायला जागा नाही.

बोर्डी : पालघर जिल्ह्यातील हजारो खलाशी सध्या गुजरातच्या विविध बंदरात अडकले असून तेथे खाण्या-पिण्याची आबाळ होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आपल्याला घरापर्यंत पोहोचवण्याची काही ना काही व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र तसेच गुजरात सरकारकडे केली आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या काळात राज्याच्या सीमा बंद असल्याने त्यांच्यासमोर कठीण प्रसंग आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरीसह अन्य तालुक्यातील हजारो आदिवासी नागरिक हे गुजरात तसेच गोवा राज्यातील मासेमारी बोटीवर तांडेल आणि खलाशी म्हणून आॅगस्ट ते मे या मासेमारी हंगामासाठी स्थलांतरित होतात. या वर्षीच्या प्रारंभी मत्स्य दुष्काळामुळे हंगामाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बोट मालकांनी अनेकांना घरी पाठवले. तर शेवटची फिशिंग करून घरी येण्याच्या तयारीत असताना त्यांना कोरोनामुळे बंदरात जहाज नांगरण्यास सांगण्यात आले. त्यामुळे जेटी, खाडी आणि किनाऱ्यालगत बोटी उभ्या कराव्या लागल्याची माहिती डहाणूतील तांडेल कमलेश माच्छी यांनी ‘लोकमत’ला दिली.

बंदराकडे एकाच वेळी अनेक बोटी येऊ लागल्याने त्या उभ्या करायला जागा नाही. तेथील प्रशासनाकडून खाण्या-पिण्याची सुविधा निर्माण केल्याचे सांगण्यात आले. मात्र कोणत्या भागात त्याचे वाटप होते, याची त्यांना माहिती नाही. बोटमालकही पुरेसे लक्ष देत नसल्याने आबाळ होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. पालघर जिल्ह्यापासून ही बंदरे सुमारे ७५० ते ८०० कि.मी. लांब असल्याने चालत अंतर कापता येणे अशक्य असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे घरापर्यंत जाण्यासाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करून जिल्हा तसेच राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे या खलाशांचे लवकर घर गाठण्याचे स्वप्न भंगणार आहे. तर घरधन्याला माघारी बोलावण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करून परतीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी खलाशांच्या कुटुंबियांकडूनही होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSea Routeसागरी महामार्ग