शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

खारबाव सरपंच यांच्या उपोषण आंदोलनाला यश; चिंचोटी मानकोली महामार्गावरील टोल नाका झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 16:38 IST

खारबाव सरपंचांच्या उपोषण आंदोलनाला यश ; चिंचोटी मानकोली महामार्गावरील टोल नाका झाला बंद , अश्वासनांनंतर उपोषण घेतले मागे  - ...

खारबाव सरपंचांच्या उपोषण आंदोलनाला यश ; चिंचोटी मानकोली महामार्गावरील टोल नाका झाला बंद , अश्वासनांनंतर उपोषण घेतले मागे 

- नितिन पंडीत 

भिवंडी- भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे.  या रस्त्याकडे टोल कंपणीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने खारबाव ग्राम पंचायतीचे सरपंच महेंद्र पाटील हे गुरुवार पासून या रस्त्यावरील मालोडी टोल नाक्यावर उपोषणासाठी बसले होते. तब्बल तीन दिवसानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम इन्फ्रा कंपनीने सरपंच महेंद्र पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या असून शनिवार पासून टोल वसुली देखील बंद करण्यात आली असल्याचे लेखी स्पष्ट केल्या नंतर महेंद्र पाटील यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दशरथ तिवरे, तालुकाध्यक्ष गणेश गुळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत महेंद्र पाटील यांनी आपले उपोषण शनिवारी दुपारी मागे घेतले.

चिंचोटी मानकोली रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे . या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असून रस्ता प्रचंड नादुरुस्त झाला आहे . मात्र या रस्त्यावर सुप्रीम कंपनीमार्फत मालोडी येथील टोल नाका राजरोसपणे सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह शासनाचे या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष जावे व हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा या मागणीसाठी खारबाव ग्राम पंचायतीचे सरपंच महेंद्र पाटील हे गुरुवार पासून मालोडी टोल नाक्यावर आमरण उपोषणास बसले होते. या आंदोलनात महेंद्र पाटील यांच्या सोबत खारबाव  ग्राम पंचायतीचे एकूण १३ सदस्य तसेच जिल्ह्या परिषद सदस्य रत्ना तांबडे , राष्ट्रवादीच्या सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष व जैष्ठ कार्यकर्ते कमलाकर टावरे , मालोडीचे उपसरपंच विशाल पाटील , प्रवीण पाटील , प्रशांत म्हात्रे आदी कार्यकर्त्यांसह साईस गृपचे तरुण कार्यकर्ते देखील य उपोषण आंदोलनात सहभागी झाले होते.

सुप्रीम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या रस्त्याबाबत दुर्लक्षित धोरणामुळे या रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी खारबावचे सरपंच महेंद्र पाटील हे गुरुवकार पासून उपोषणास बसले होते. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, रस्ता जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल नाका बंद करावा , काँक्रेटकरणाचे व दुरुस्तीचे काम उच्च दर्जाचे असावे, रस्त्याची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत या व अशा मागण्यांसाठी सरपंच पाटील हे गुरुवार पासून मालोडी टोल नाक्याच्या बाजूलाच उपोषणाला बसले आहेत. अखेर सुप्रीम कंपनी पाटील यांच्या आंदोलनापुढे नमली असून शनिवारी टोल नाका बंद करत हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र जोपर्यंत रस्ता पूर्ण दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल नाका बंद ठेवावे लागेल जर टोल नाका रस्ता दुरुस्ती आधी सुरु केला तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महेंद्र पाटील यांनी टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीला दिला आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार