शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

लहरी पावसावर तोडगा; वापरा आधुनिक पद्धती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 11:28 PM

लहरी पावसामुळे पारंपरिकऐवजी आधुनिक पद्धतीने भात लागवड करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे चिखलणी, रोपवाटिका बनविणे आणि लावणी या प्रकारांना छेद देत सरासरी उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते.

बोर्डी - लहरी पावसामुळे पारंपरिकऐवजी आधुनिक पद्धतीने भात लागवड करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे चिखलणी, रोपवाटिका बनविणे आणि लावणी या प्रकारांना छेद देत सरासरी उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते. कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात याबद्दलचे प्रयोग मागील पाच-सहा वर्षांपासून सुरू असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाऊन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.मागील दशकापासून मान्सूनच्या लहारीपणामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भात लागवडीवर विपरीत परिणाम होत आहे. घटत्या उत्पादनामुळे शेतकरी भात पिकापासून फारकत घेत असून हे क्षेत्र घटत आहे. भात हे अधिक पावसावर घेतले जाते. मात्र पावसाचा कालावधी बदलल्याने पारंपरिक ऐवजी आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यास अपेक्षित पीक घेण्याचे तंत्र कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे शिकविले जात असून त्याचा परिणाम उत्पादन वाढीत होत आहे. या पद्धतीमुळे चिखलणी, रोपवाटिका बनविणे, भाताची खणणी आणि लावणी करण्याची आवश्यकता नसल्याने मजुरी व चिखलणीकरिता केला जाणारा खर्च कमी होत आहे. शिवाय कमी कालावधीत पीक तयार होऊन अपेक्षित उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करता येते.कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे चार प्रकारच्या आधुनिक पद्धती अवलंबिण्याचे सुचविले जात आहे. त्यानुसार ट्रे वापरुन रोपवाटिका केल्यास एकरी केवळ ३ ते ४ किलो बियाणे लागते. तर पारंपरिक पद्धतीने एकरी १५ ते १८ किलो बियाण्याची आवश्यकता भासते. या आधुनिक पद्धतीने कमी बियाणे लागत असून मजुरीचा खर्चही वाचविता येतो. ड्रम पद्धतीने भात लागवड करण्याकरिता पावसाळ्या पूर्वी जमिनीची मशागत करण्याची आवश्यकता असून ड्रमच्या सहाय्याने भात लागवड केली जाते. याद्वारे प्रति एकरी ८ ते १० किलो बियाण्याची गरज लागते. एका दिवसात दोन मजूर दोन एकरापर्यंत लागवड करू शकतात. त्यामुळे मजुरीचे तीस दिवस वाचत असून एकरी सुमारे पाचहजार रु पये उत्पादन खर्च वाचविता येतो. महत्त्वाचे म्हणजे पीक ८ ते १० दिवस आधी तयार होते.तर टोकन पद्धतीने भात लागवड करण्याकरिता जमिनीची मशागत करून २० बाय २० सेमी अंतरावर ४ ते ५ दाणे याप्रमाणे घेऊन कंपोस्ट खताने खड्डे झाकून घ्यावे लागतात. मिरची किंवा अन्य पिकाप्रमाणेच भात सुद्धा माल्चिंग पद्धतीने घेतले जाते. पावसापूर्वी जमिनीची मशागत आवश्यक असून ४.५ फुट अंतरावर सरी पाडून १०० सेमीचा गादीवाफा तयार केला जातो. त्यावर माल्चिग पेपर अंथरून १ फूट अंतरावर छिद्र पाडून त्यामध्ये ४ ते ५ दाणे टाकून कंपोस्ट खताने झाकून घेतले जाते. या पद्धतीने मजुरीची बचत तर होतेच शिवाय ८ ते १० दिवस अगोदर पीक तयार होते. त्यानंतर रब्बी हंगामात याच बेडवर हरभरा लावता येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच बेडवर दोन वर्षात भात आणि हरभरा पीक घेता येते हे विशेष. सगुणा भात तंत्रज्ञान ही सुद्धा आधुनिक भात लागवडीची आणखी पद्धती असून या भात लावडीच्या पद्धतीविषयी अधिक माहितीसाठी केंद्राशी ९८५०२६०३५५ संपर्क साधावा, अशी माहिती प्राध्यापक भरत कुशारे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती