शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोपारा स्तुप देतो शांतीचा संदेश अन् गातो महती बौद्ध स्तुपाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 04:04 IST

सोपारा येथील बौद्धस्तुपालाअडीच हजार वर्षांपूवीर्चा इतिहास असल्याचे बोलले जाते. सम्राट अशोकाने भारतात उभारलेल्या बुद्धस्तुपांपैकी एक असलेला सुर्प्पारक बुद्ध स्तूप आहे.

वसई : सोपारा येथील बौद्धस्तुपालाअडीच हजार वर्षांपूवीर्चा इतिहास असल्याचे बोलले जाते. सम्राट अशोकाने भारतात उभारलेल्या बुद्धस्तुपांपैकी एक असलेला सुर्प्पारक बुद्ध स्तूप आहे. हा स्तूप भगवान बौद्धाच्या भिक्षापात्राच्या अवशेषाची चिरंतन स्मृती रहावी, या हेतूने स्थापन करण्यात आला होता. सम्राट अशोकाने राजपूत्र मिलिंद आणि राजकन्या संघमित्रा यांना येथूनच बौध्द धर्म प्रचारासाठी सिलोन येथे पाठविले होते.हा स्तुप सांची स्तुपासारखा होता. २६०० वर्षापूर्वी शुर्पारक नगरीतून पुर्णा नावाचा एक प्रसिध्द व्यापारी श्रावस्ती (उत्तर प्रदेश) येथे व्यापारासाठी गेला. तेथे भगवान गौतम बुध्दांची प्रवचन ऐकून तो प्रभावित झाला. त्याच्या मनात वैराग्य निर्माण झाले. तो भगवान गौतम बुद्धांकडे प्रवजीत (दिक्षीत) झाला. पुर्णा भिक्खु झाल्यावर काही वर्षे श्रावस्तीत जमतवन विहारात भगवान बुद्धांच्या सहवासात राहून त्याने धम्माचा परीपुर्ण अभ्यास केला. आणि धम्माचा प्रचारासाठी अनुज्ञा घेऊन तो अपरान्त प्रदेशात (महाराष्टÑ) आपल्या मुळ गावी सोपाऱ्याला आला.इथे आल्यावर त्यांनी एक चंदनाचा विशाल बुद्ध विहार बांधला. त्या विहाराला आठ दरवाजे होते. बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी त्यांनी भगवान गौतम बुद्धांना पाचारण केले. भगवान बुद्ध या चंदनाच्या विहाराच्या उद्घाटनासाठी सोपायाला आपल्या ५०० भिखु समवेत आले व सात दिवस इथे थांबले होते. भगवान बुद्धांची आठवण चिरंतर रहावी म्हणून पुर्णाने त्यांच्याकडे भिक्षा पात्र मागीतले. भगवंताच्या महापरिनिर्वाणा नंतर २०० वर्षानी सम्राट अशोकाने इथेच स्तुपाची निर्मीती केली. सविस्तर वृत्त/२सोन्याच्या करंडीत भिक्षापात्राचे तुकडेइ.स.पूर्व २५० ते १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात सोपारा हे केवळ धामिर्क केंद्र नव्हे तर भारताच्या प्रसिद्ध पश्चिम किनारा व पश्चिम पट्टयातील एक उत्कृष्ट शहर, व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. पायथ्यापासून अलंकाराच्या शिखरापर्यंत स्तुपाची उंची साधारण ५५ फूट, दगडी तिजोरीचा १७ व्यास व २४ इंच, तिजोरीत तांब्याच्या करंडीत वर्तुळाकार ठेवलेल्या भगवान बुद्धाच्या ब्राँझ धातूच्या ८ मूर्ती त्यात सोन्याच्या करंडीत भिक्षापात्राचे १३ तुकडे असे अवशेष एशियाटिक सोसायटीने सुरिक्षत ठेवले आहेत.बुरुड राजाचा किल्ला असेही संबोधनसंघमित्रा आपल्या ६ भिक्खुणी समवेत बोधी वृक्षाची पिंपळाची फांदी घेऊन समुद्र मार्गे श्रीलंकेला गेली. दरम्यान तिने या विहाराला भेट दिली होती. सम्राट अशोकाने १४ शिलालेख कोरले. त्यातला ८ वा शिलालेख पं. भगवानलाल यांनी १८८२ साली भातेला तलावाजवळ शोधला.९ वा शिलालेख मुंबईचे ऐशियाटीक सोसायटीचे ग्रंथपाल श्री. एन .ए. मोरे यांनी भुईगाव येथे १९५६ शोधून काढला. त्याचबरोबर ठाण्याचे म्ययूलॉग कलेक्टरच्या मदतीने स्तुपाचे उत्खनन केले. तेव्हा हा स्तुप जमीनीमध्ये गाडला गेला होता. स्थानिक लोक याला बुरूड राजाचा किल्ला म्हणू लागले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार