शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने फिरवले ५०० कोटी रुपयांवर पाणी

By admin | Updated: June 20, 2015 12:58 IST

शुक्रवारच्या पावसानं नुसतं मुंबईचं जीवनमान ठप्प केलं नाही तर दुकानदारांचं सुमारे ५०० कोटी रुपयांचं नुकसान केलं असा अंदाज या क्षेत्रातल्या जाणकारांनी व्यक्त केला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - शुक्रवारच्या पावसानं नुसतं मुंबईचं जीवनमान ठप्प केलं नाही तर दुकानदारांचं सुमारे ५०० कोटी रुपयांचं नुकसान केलं असा अंदाज या क्षेत्रातल्या जाणकारांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये सुमारे ३.५ लाख दुकाने असून त्यातील जवळपास ८० टक्के दुकाने शुक्रवारी बंद ठेवावी लागली होती.
फेरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांच्या सांगण्यानुसार रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे बहुतेक दुकानांमधील कर्मचारी कामावर आले नाहीत, तसेच रस्ते ओस पडले होते आणि ग्राहकही फिरकत नव्हते. मुंबईमध्ये सुमारे ३.५ लाख दुकाने असून दिवसाला प्रत्येक दुकानाचे सरासरी उत्पन्न १० ते १५ हजार रुपयांचे आहे. त्यामुळे अंदाजे मुंबईकर दुकानदारांचे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही दुकानांचे उत्पन्न दिवसाला लाखात आहे तर काहींचे हजारात आहे, परंतु सरासरी १० ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न आहे असे ते म्हणाले.
दुकानांमध्ये पाणी शिरुन अनेक ठिकाणी मालाचे नुकसानही झाले आहे, परंतु त्याची आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही त्यामुळे ते नुकसान वेगळेच आहे. दुकानांपाठोपाठ दुसरा मोठा धक्का हॉटेलांना बसला आहे. उपनगरांमधले चाकरमानी शहरात आलेच नाहीत त्यामुळे बहुतेक हॉटेल व रेस्टॉरंट ओस पडलेली होती असे आहारच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी सांगितले. मुंबईतल्या प्रत्येक हॉटेलला हा फटका बसल्याचे शेट्टी म्हणाले.