शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

वाड्यात दूषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 01:43 IST

नगरपंचायतीमार्फत सुरू असलेला पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ असून नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वाडा : नगरपंचायतीमार्फत सुरू असलेला पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ असून नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने अनेक कुटुंबांना मिनरल वॉटर (जार) वर अवलंबून रहावे लागते आहे. त्यामुळे दुकानांमध्ये जार घेण्यासाठी गर्दी दिसते आहे.गढूळ पाण्यामुळे शहरातील साथीच्या रोगांचे प्रमाण वाढलेले दिसते. थंडी, ताप, जुलाबाची लागण अनेकांना झाली आहे. शहरातील दवाखान्यांमध्ये रुग्ण दिसत आहेत. दरम्यान, अतिवृष्टीमुळे विहिरींमधे गाळ गेल्याने पाणी अशुद्ध झाले असून यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. यासाठी तत्काळ विहिरींमधील पाणी काढून त्या साफ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी शनिवारच्या आढावा बैठकीत दिल्या होत्या. पाण्याने रोगराई उद्भवल्यास तालुका आरोग्य अधिकारी आणि पाणीपुरवठा विभाग जबाबदार राहील असेही ठणकावले होते.या संदर्भात नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा विभाग अभियंत्याशी संपर्क साधा. तेच तुम्हाला याविषयी अधिक माहिती देतील. मी सध्या बाहेर आहे.- गीतांजली कोलेकर,नगराध्यक्षा, वाडाजलशुध्दीकरण यंत्रणा बिघडल्याने सध्या दूषित पाणी पुरवठा होत आहे. लवकरच ते दुरूस्त करू शुध्द पाणी पुरवठा केला जाईल. तात्पुरता उपाय म्हणून नागरिकांना क्लोरीन बॉटलचे वाटप करून पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नवीन जलशुध्दीकरण यंत्रणा बसविण्याच्या दृष्टीने देखील आमचे प्रयत्न सुरू आहेत.- जाग्रती कालन, सभापती,पाणी पुरवठा विभाग, वाडा नगरपंचायतफिल्टर प्लॅन हा साधारणपणे २० वर्षांपूर्वीचा आहे. ही पाणी शुद्धीकरण यंत्रणा नसून ती पाणी गाळून जाण्याची गाळणी आहे. त्यातील वाळू बदलण्याचा एकदा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही.- बंड्या सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरार