शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

आदिवासी भागातील रस्त्यांची दुर्दशा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 1:43 AM

जव्हार तालुक्यातील परिस्थिती : रस्त्यांच्या दुरवस्थेवर मतदार नाराज

- हुसेन मेमन ।

जव्हार : ग्रामीण आदिवासी भागातील रस्त्यांच्या विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी करोडो रुपये निधी उपलब्ध होतो. मात्र, आजही आदिवासी भागातील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. त्यामुळे येथील आदिवासी मतदार वैतागले असून, नेत्यांच्या प्रचाराला येणाऱ्या कार्यकर्त्यांना, आदिवासी भागातील निधी जातो कुठे? अशी विचारणा केली जात आहे.

जव्हार तालुक्यात १ लाख ६० हजार लोकसंख्या असून, १०९ महसूल गावे आणि २४५ पाडे आहेत. मात्र या तालुक्याला जोडणाºया रस्त्यांची कामे न झाल्याने मतदारांना दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. त्यामुळे आदिवासी मतदार यावर्षी कोणाला कौल देणार हे अनुत्तरीतच आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती बांधकाम विभाग या विभागांकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी दरवर्षी करोडो रुपये येत आहेत. मात्र, तरीही तालुक्यातील गावांना जोडणाºया महत्त्वाच्या रस्त्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.

जव्हार ते दाभोसा, सिल्वासा - गुजरात रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे. त्यातच पावसाळ्यात ठिकठिकाणी रस्ता वाहून गेल्याने दुरवस्था झाली आहे. जव्हार - वाडा - विक्र मगड रस्ता हे तालुक्यातून जाणारे महत्त्वाचे रस्ते आहेत. आदिवासी भागातील देहेरे - मेढा रस्ता, केळीचापाडा - साकूर, झाप रस्ता, जामसर - सारसून, ढाढरी रस्ता, या ग्रामीण भागातील महत्त्वाच्या रस्त्यांची देखील दुर्दशा झालेली दिसते. दरवर्षी ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी लाखोंचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची अवस्था बिकट कशी, असा प्रश्न नागरिकांना भेडसावतो आहे.

तालुक्यातील काही रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण किंवा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे कामे झाली आहेत.परंतु हे डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते आणि बुजविण्यात आलेले खड्डे वर्षभरातच उखडून निघाल्याचे चित्र दिसते आहे. खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे वाहन चालक आणि नागरिक वैतागले आहेत.

साधे खड्डे बुजविण्यात पालिका असमर्थ

जव्हार शहरातील मुख्य रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली असून, रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली आहे. यामुळे अपघात होत आहेत. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होते आहे. कित्येक वर्षापासून भाग शाळा ते सोनार आळी या रस्यावर मोठा खड्डा पडला आहे. याबाबत बांधकाम विभागाला सांगूनही आजतागायत तो खड्डा बुजवण्यात आलेला नाही. तसेच शहरातील तारपा चौक ते भाग शाळा आणि तारपा चौक ते सोनार आळी या रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. डांबरी रस्ता पूर्णपणे उखडून रस्त्यावर खडी पसरली. त्यामुळे येथे दुचाकी स्लिप होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्री बे-रात्री ही खडी वाहन चालकांना दिसत नाही. परिणामी अपघात होतात. तसेच सूर्यतलाव ते मांगेलवाडा या रस्त्याची तर भयानक अवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठ मोठ खड्डे पडले असून वाहन चालकांना पाठीचे रोग जडल्याच्या घटना घडत आहेत.

संपूर्ण शहरात रस्त्यांची अवस्था बिकट असूनही बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार नागरीक करीत आहेत. गणेशोत्सवाच्या काळातही पाऊस खूप असल्याचे कारण देत पालिकेने खड्डे बुजविले नव्हते. तर नवरात्रातही तेच कारण देत खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. आता यात नगरध्यक्षांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

आम्ही खड्डे बुजविण्याचे काम लवकरच सुरू होईल. रस्त्यावर उखडलेल्या खडी उचलण्याच्या सूचना देतो. सध्या इलेक्शन ड्यूटीच्या कामात सर्वच कर्मचारी व्यस्त असल्याचे जव्हार नगर पालिकेचे मुख्याधिकारी मिलींद बोरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक