शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

आता माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी कृषी पदवीधरही पात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 11:41 PM

शासन निर्णय प्रसिद्ध : शालेय शिक्षणात कृषीविषय लागू करा

वाडा : राज्यात माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदव्यांमध्ये सुधारणा करुन काही नव्या पदव्यांचा समावेश करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या बाबत १२ जून रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात कृषी पदवीचा समावेश केल्याने राज्यातील हजारो कृषी पदवीधारकांना दिलासा मिळणार आहे. या शासन निर्णयाचे कृषी पदवी व कृषी विद्यार्थी संघटनानी स्वागत केले आहे.

यासंबंधीचा शासन आदेश शालेय शिक्षण विभागातर्फे नुकताच जारी करण्यात आला. या निर्णयानुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान, पर्यावरणशास्त्र विषयातील पदव्यांसोबतच सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र आणि कृषीशास्त्र या पदव्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच इयत्ता नववी व दहावी शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान, पर्यावरणशास्त्र विषयातील पदव्यांसोबतच सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायन शास्त्र आणि कृषीशास्त्र या पदव्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय इतरही काही विषयातील पदव्यांचा समावेश नव्या निर्णयात करण्यात आला आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी आता कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. कृषी पदवीधारकांचा माध्यमिक शाळांच्या नोकरीतील प्रवेशाचामार्ग मोकळा होणार आहे. या शासन निर्णयाचा विविध कृषी पदवी व कृषी विद्यार्थी संघटनानी स्वागत केले आहे.मुख्यमंत्र्यांना कृषी शिक्षक नेमण्याची मागणीच्अजूनही ग्रामीण भागातील शेतकरी नवनवीन आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाची माहिती नसल्याने शेती उत्पादनात मोठे नुकसान होत आहे. शेती क्षेत्रातील व्यवसायात तरुणांची संख्या कमी होऊ लागली आहे. तरु णांना शाळेय शिक्षणापासून शेतीचे शिक्षण दिल्यास शेती क्षेत्राला अच्छे दिन येतील व मोठा रोजगार उपलब्ध होईल.च्याबाबत तत्कालीन शिक्षण मंत्री वसंत पुरके यानी शालेय शिक्षणात कृषी शिक्षणाचा समावेश करावा अशी शिफारस केली होती.त्यामुळे शासनाने शालेय अभ्यासक्र मात कृषी विषय शिक्षणाचा समावेश करु न कृषी पदविका, पदवीचे शिक्षण घेतलेल्या शिक्षकाचा नेमणुका कराव्यात, अशी मागणी कोकण विभाग कृषि पदविकाधारक संघर्ष समितीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.१२ जूनच्या नव्या शासन निर्णयामुळे माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी आता कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. कृषी पदवीधारकांचा माध्यमिक शाळांच्या नोकरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे. या निर्णयाने राज्यातील हजारो कृषी पदवीधारकांना दिलासा मिळणार आहे. या शासन निर्णयचा आम्ही स्वागत करतो, परंतु आमची मूळ मागणी आहे ती पहिली ते १२ वी शालेय शिक्षणात (अभ्यासक्र मात) कृषी विषयाचा समावेश करुन कृषी शिक्षक नेमावेत याबाबत आमच्या संघटनेमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व कृषी मंत्री याना निवेदन दिले आहे. या मागणीबाबत शासनाने गांभिर्यपूर्वक विचार करावा.- अमोल सांबरे, उपाध्यक्ष,कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समिती 

टॅग्स :Teacherशिक्षकagricultureशेती