शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

Maharashtra Election 2019: महिलांकडे नेतृत्व देण्यास पक्षांची अनास्था; ३३ टक्के आरक्षणासाठी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 11:54 PM

महाराष्ट्र हे पुरोगामी विचारसरणी आणि महिला विकासाचा पुरस्कार करणारे राज्य म्हणून ओळखले जाते.

पालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील सहापैकी डहाणू, विक्रमगड, वसई आणि नालासोपारा या चार विधानसभा मतदार संघातील महिला उमेदवारांवर भरलेले अर्ज मागे घेण्याची वेळ ओढवली. यामुळे विधानसभेवर महिला उमेदवारांना पाठविण्यात राजकीय पक्षांतील पुरु षांचे वर्चस्व आड येत असल्याने महिला वर्गातल्या नाराजीची दबकी चर्चा जिल्ह्यात आहे.महाराष्ट्र हे पुरोगामी विचारसरणी आणि महिला विकासाचा पुरस्कार करणारे राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण लागू झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेसाठी तेहतीस टक्के आरक्षण मिळवण्यासाठी महिलांना झगडावे लागत आहे. २०१९ ची लोकसभा आणि २१ आॅक्टोबर रोजीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही महिलांना उमेदवारी देण्यात राजकीय पक्षांना विशेष रस नसल्याचे दिसून आले आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्र मगड, पालघर, बोईसर, वसई आणि नालासोपारा या मतदारसंघापैकी सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी डहाणू विधानसभा मतदार संघातील सेनेच्या माजी जि.प. सदस्य वैदही वाढाण, विक्रमगडहून सुरेखा थेतले आणि वसई तसेच नालासोपारा मतदारसंघातून माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी अर्ज मागे घेतला.विक्र मगड मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा सुरेखा थेतले यांना होती. मात्र यासाठी माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सवरा यांना भाजपमधून झुकते माप दिल्याच्या नाराजीतून थेतले यांनी अपक्ष लढण्याच्या इराद्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी अर्ज मागे घेण्याच्या आधी सर्व बंड थंड केले जातील असा इशारा दिल्याने अर्ज माघार घेण्याच्या आदल्या दिवशी सुरेखा थेतले यांसह अन्य दोन बंडखोर उमेदवारांना मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावून घेत अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे तीनही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.थेतले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून स्वत:चे नेतृत्वगुण सिद्ध करताना जिल्हापरिषदेच्या अडीच वर्षाच्या कालावधीत महिला सक्षमीकरणासह अनेक सकारात्मक निर्णय घेत आपली छाप पाडली होती. सेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या असलेल्या वैदेही वाढाण या सध्या जिल्हा उपमहिला संघटक असून पालघर, डहाणू विधानसभा मतदार संघातील गाव-पाड्यात निष्ठेने काम करून महिलांची फळी उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पालघर अथवा डहाणू मतदारसंघात त्या उमेदवारीसाठी त्या इच्छुक होत्या. डहाणू विधानसभेत त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश पक्ष श्रेष्टींनी दिल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यांनाही अर्ज मागे घेण्यात सांगण्यात आल्याने त्या नाउमेद झाल्या आहेत. तर वसई व नालासोपारा या शहरी मतदार संघातून माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे.नेतृत्व गुण असूनही संधी नाहीया तीनही महिला उमेदवारांची आतापर्यंतची यशस्वी राजकीय कारकीर्द आणि जनमानसातील प्रभाव पाहता या जिल्ह्यातून विधानसभेवर जाणारे खमके नेतृत्वगुण त्यांच्यात होते.मात्र राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांकडून महिला उमेदवारांना लोकसभा आणि विधानसभेवर पाठविण्यात पक्षात वर्चस्व असलेल्या पुरूषांना स्वारस्य नसल्याचे दिसते.त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत, जिल्ह्यातीलमहिलांचा विचार होईल का? याचीवाट पहावी लागणार आहे.अनेक वर्षांपासून पक्षात कार्यरत असताना दोन वर्षांपासून डहाणू - पालघर मतदार संघात पक्ष वाढीसाठी निष्ठेने काम करते. महिला मतदारातून मला उमेदवारी मिळावी म्हणून मागणी होत असल्याने अर्ज भरला. तो वरिष्ठांच्या आदेशाने मागे घेतला.- वैदेही वाढाण,शिवसेना, जिल्हा उपसंघटक.

टॅग्स :palghar-acपालघरvikramgad-acविक्रमगडdahanu-acडहाणूvasai-acवसईnalasopara-acनालासोपारा