शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Maharashtra Election 2019: ग्रामीण भागात मतदारांमध्ये निरुत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 2:05 AM

Maharashtra Election 2019: मतदानाचा टक्का घटणार? : आरोग्य, शैक्षणिक, भूकंप आदी समस्या

कासा : डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात अजूनही प्रचाराचा पाहिजे तेवढा प्रचाराचा जोर दिसत नाही. त्यातच या भागात अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये निरुत्साह दिसत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घटण्याची शक्यता आहे.

डहाणू तालुक्याचा कासा, वाणगाव, गंजाड हा भाग पालघर मतदारसंघात येतो. तर सायवन, धुंदलवाडी, मोडगाव आदी ग्रामीण भाग डहाणू मतदारसंघात येतो. ग्रामीण आणि आदिवासी भागात विविध प्रकारच्या समस्या आजही भेडसावत आहेत. हा भाग आदिवासी असून येथे कोणत्याही विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच महामार्गवर सतत होणारे अपघात त्यामुळे या भागात सुसज्ज दवाखान्याची गरजे आहे. यासाठी अनेक वर्षांपासून नागरिक मागणी करीत आहेत. जवळपास कासा येथे एकमेव उपजिल्हा रुग्णालय आहे. मात्र तिथे डॉक्टर, कर्मचारी यांची कमतरता तसेच कोणत्याही अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे कठीण परिस्थितीत रुग्णांना १०० किमी अंतरावर मुंबई - ठाणे, ५० ते ६० किमी वापी, सेलवासाकडे जावे लागते. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रु ग्णांनी आपला जीव गमावला आहे.

या भागात शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे शैक्षणिक विकास झालेला नाही. इंजिनिअरिंग, वैद्यकीय, कायदा, कृषी आदी कोणतीही कॉलेज नाहीत. त्यामुळे पुढीलशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागते. सात आठ महिन्यांपासून या भागात वारंवार भूकंप होतात. त्याची तीव्रता ३ ते ४ रिश्टर स्केल असली तरी धुंदलवाडी भागात काही घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील नागरिक दडपणाखाली जीवन जगत आहेत. शासकीय स्तरावर कोणत्याही विशेष उपयोजना केलेल्या नाहीत.

प्रचारादरम्यान उमेदवारांकडून ठोस आश्वासन नाही

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या प्रचारादरम्यान कोणत्याही पक्षाचे उमेदवार येथील समस्या सोडवण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन देत नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये निरुत्साह आहे. या भागात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकरी वर्ग भात कापणी कामाला लागला आहे. तर काही मजुरवर्ग भात कापणीसाठी दरवर्षी वाडा, पालघर वसई, भिवंडी आदी भागात जातो. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना प्रचारसभा व मतदानासाठी बाहेर काढणे मोठे आव्हान आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान