शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

हितेंद्र ठाकूर मंत्री होणार?; राष्ट्रवादीचीही वर्णी लागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 00:59 IST

मंत्रीमंडळ विस्तारात पालघर जिल्ह्याला संधी मिळणार?

पालघर : बहुजन विकास आघाडीच्या जिल्ह्यातील तीनही आमदारांनी महाविकासआघाडीच्या सरकारला पाठिंबा जाहीर केल्याने लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात बविआचे अध्यक्ष तथा आ. हितेंद्र ठाकूर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेसची झालेली दयनीय अवस्था पाहता राष्ट्रवादीची ताकद वाढण्याच्या दृष्टीने विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आ. सुनील भुसारा यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो.

बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सेना नेत्यांकडून बविआ आणि आ. ठाकूर यांच्यावर जहरी टीका करण्यात आली होती. परंतु सध्या त्यांच्या तीनही आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे, सध्या पाठिंबा देणाºया सहकारी मित्रपक्षाच्या भूमिकेत ते असल्याने त्यांना कशा पद्धतीने सामावून घेतले जाते हे दिसून येणार आहे. यापूर्वीही एकदा चालून आलेले मंत्रीपद आ. ठाकुरांनी नाकारले होते. आणि त्याऐवजी आपल्या क्षेत्राच्या विकासाच्या नावावर अनेक योजना पदरी पाडून घेतल्या होत्या. मात्र, आता निवडणुकीची शेवटची टर्म असल्याचे जाहीर करणाºया आ. हितेंद्र ठाकुरांची रणनीती काय असणार, हे लवकरच उघड होणार आहे.

दुसरीकडे खा. राजेंद्र गावीत यांच्या रूपाने काँग्रेसला जिल्ह्यात उभारी मिळत असल्याचे दिसत असतानाच काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून गावितांनी प्रथम भाजप आणि नंतर शिवसेनेचा रस्ता धरल्याने जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढवल्याने काँग्रेसच्या या दयनीय अवस्थेचा फायदा उचलण्याची संधी राष्ट्रवादीकडे चालून आली. त्यामुळे विधानसभेसाठी राष्ट्रवादीने शिवसेनेचे माजी आ. अमित घोडा यांना बंडखोरी करायला लावत उमेदवारी दिली होती.

मात्र हा डाव शिवसेनेने उधळून लावल्याने राष्ट्रवादी संधीच्या शोधात होती. आता राष्ट्रवादीकडून आमदार सुनील भुसारा यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लावून पुढच्या महिन्यात होणाºया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्ष वाढीचे प्रयत्न केले जाऊ शकतात. किंवा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंत्रीपद देऊन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिल्यास राष्ट्रवादी लोकसभा आणि पालघर विधानसभा जागेवर दावा करू शकते.

दरम्यान, सध्या महाराष्ट्राचे राजकारण ठाणे जिल्ह्याभोवती फिरताना दिसत आहे. १८ आमदारांच्या या जिल्ह्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून अद्यापही खातेवाटपावरुन गु्ऱ्हाळ सुरूच आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना आता या मंत्रिमंडळांत स्थान मिळणार का? याबाबत मात्र अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत. यासाठी काहींकडून जोरदार लॉबिंग सुरू असले तरी काहींच्या अपेक्षांना नाराजीचा सुरुंग लागणार असल्याचेच चित्र सध्या दिसत आहे.

शिवसेनेतील पाचपैकी एकनाथ शिंदे यांचे नाव सुरुवातीपासून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. परंतु, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडेच मुख्यमंत्रीपद ठेवले आहे. त्यामुळे आता शिंदेच्या वाट्याला कोणते खाते येणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खातेवाटपावरून खलबते सुरू आहेत.

जितेंद्र आव्हाड पालघरचे पालकमंत्री?

मुंब्रा - कळव्यातून सलग हॅट्रिक साधणारे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनाही कॅबिनेटमध्ये स्थान हवे आहे. सुरुवातीला त्यांना पालघरचे पालकमंत्रीपदी आणि कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाईल, असे बोलले जात होते. मात्र आता नशीबात जे असेल ते मिळतेच, जे नसते ते मिळत नाही, अशी पोस्ट सध्या त्यांची फेसबुकवर फिरत आहे, त्यामुळे त्यांच्या नशीबात लाल दिव्याची गाडी आहे, किंवा नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.

टॅग्स :Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरVasai Virarवसई विरारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड