शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

'मी विजबिल भरणार नाही, तुम्हीही भरू नका', हितेंद्र ठाकुरांचे वसईकरांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 23:13 IST

चक्क लॉकडाऊन काळात हितेंद्र ठाकूर यांना पाच बिले मिळून तब्बल  5 लाख 50 हजारांचे विजबिल महावितरणने पाठवल्याने त्यांनी महावितरण व राज्य सरकारवर टीका करत प्रचंड रोष व्यक्त केला आहे.

वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात विरारस्थित शाळा, कॉलेज बंद असताना देखील माझ्या  निवासस्थानासह अवास्तव आलेली साडेपाच लाखांची विजबिले मी अजिबात भरणार नाही, किंबहुना जी विजबिलं योग्य आहेत. ती त्यांनी जरूर भरावी. मात्र अवास्तव बिले तुम्हीही भरू नका, असे जाहीर आवाहनच आता वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसईतील जनतेला केले आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरारस्थित विवा कॉलेज, शाळा व घराचे विजबिल भरमसाठ आले असून त्यांना पाच बिलं मिळून  चक्क 5 लाख 50 हजारांचे विजबिल आले असल्याची माहिती स्वतः आम हितेंद्र ठाकूर यांनी शनिवारी विरार येथे लोकमतशी बोलताना दिली.

राज्यभरात विजबिलाच्या असंख्य तक्रारींचा महापूर सुरू असताना सततच्या तक्रारींनी राज्य सरकारचीही डोकेदुखी कमालीची वाढली आहे. यात सर्वसामान्यांपासून राजकीय नेते, व्यवसायिक असतील तर यात सेलिब्रिटीं देखील असून अशा अनेकांनी जाहीररित्या वाढीव व अवास्तव विजबिलाबाबत प्रंचड रोष व्यक्त केला आहे. यामध्ये आता हितेंद्र ठाकूर यांचाही समावेश झाला आहे. चक्क लॉकडाऊन काळात हितेंद्र ठाकूर यांना पाच बिले मिळून तब्बल  5 लाख 50 हजारांचे विजबिल महावितरणने पाठवल्याने त्यांनी महावितरण व राज्य सरकारवर टीका करत प्रचंड रोष व्यक्त केला आहे. सर्वसामान्य नागरिक हैराण असून महावितरण नागरिकांना अवास्तव विजबिलं पाठवत असून अशी अवास्तव विजबिलं नागरिकांनी अजिबात भरू नये मी तुमच्या सोबत आहे. मात्र विजबिलं योग्य असतील तर जरूर भरा,असे आवाहन आता या निमित्ताने हितेंद्र ठाकूर यांनी वसईकरांना केले आहे

कोरोना संकटात आधीच जनता हैराण आहे. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरु नये. कंपनी, उद्योगधंदे बंद आहेत. नोकऱ्या नाहीत, कुठं पगार नाहीत तर बहुतांश वेतन कपात देखील सुरू आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद असून विजबिले अवास्तव कशी येऊ शकतात तर मुंबईत अदानी व अंबानी यांच्या युनिटच्या दरापेक्षा आपल्या शासनाचे वीजदर अधिक आहेत तर लॉकडाऊन सरकारने केला त्याची चूक हकनाक नागरिकांना का?  तर यावर तोडगा काढा जनतेला दिलासा द्या, असे हितेंद्र ठाकूर यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार