शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

अर्नाळा किल्लावासीयांच्या पदरी घोर निराशा, जेट्टीचे काम कासवगतीने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 12:50 AM

भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकांहून अधिक काळ लोटला, मात्र या प्रदीर्घ काळात अनेक भागांत स्वातंत्र्याची पहाट खऱ्या अर्थाने अद्याप पोहोचलेली नाही. याचा प्रत्यय विरार पश्‍चिमेच्या समुद्रातील अर्नाळा किल्लावासीयांना येत आहे.

- सुनील घरत पारोळ - भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकांहून अधिक काळ लोटला, मात्र या प्रदीर्घ काळात अनेक भागांत स्वातंत्र्याची पहाट खऱ्या अर्थाने अद्याप पोहोचलेली नाही. यामुळे आजही मोठ्या जनजीवनाला यातनामय जीवन जगावे लागत आहे. याचा प्रत्यय विरार पश्‍चिमेच्या समुद्रातील अर्नाळा किल्लावासीयांना येत आहे.या ठिकाणच्या ग्रामस्थांना समुद्रातून बोटीने प्रवास करून शहरात यावे लागते. संध्याकाळी ७ नंतर बोट बंद होत असल्याने किल्ल्याबाहेर पडताना नागरिकांना वेळेचे भान ठेवावे लागते. अन्यथा पूर्ण रात्र किनारपट्टीवर घालवण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. अर्नाळा किल्लावासीयांसाठी मागील ४ वर्षांपासून समुद्रीमार्गे जेट्टी (पूल) बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. धूपप्रतिबंधक बंधारा बांधून मंजूर होऊन काम सुरूदेखील करण्यात आले आहे. पण काम संथगतीने सुरू असल्याने पुढील वर्षीच्या पावसाळ्यात येथील आणखी २० ते २५ घरे समुद्र गिळंकृत करण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.माजी खासदार तथा माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी अर्नाळा किल्ला परिसरात असलेले काळोखाचे साम्राज्य पूर्णपणे नाहीसे करून विजेची सोय उपलब्ध करून दिली. त्याआधी बेरोजगारी आणि अज्ञानाच्या दरीत खितपत पडलेला अर्नाळा किल्ला परिसरातील तरुण वर्ग आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक बाबतीत प्रगती करू लागला आहे. वसई तालुक्यात होणारे महोत्सव, तरुणांना चालना देणारे उपक्रम या सर्वांत अर्नाळा किल्ला परिसरातील तरुण-तरुणी हिरिरीने सहभाग घेऊन अर्नाळा किल्ला परिसराचे नाव उज्ज्वल करू लागले आहेत. मात्र अर्नाळा किल्ला परिसरातून बाहेरच्या जगात पाय ठेवताना येथील ग्रामस्थांना वेळेचे भान ठेवावे लागत आहे. संध्याकाळी सातनंतर अर्नाळा किनारपट्टीवर पोहोचल्यानंतर बोटीअभावी नागरिकांना किनाऱ्यावरच थांबावे  लागते. दरम्यान, येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे बांधकामही संथगतीने सुरू असल्यानेच नागरिकांच्या घरांची दरवर्षी पडझड होते, असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार