शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

चार महिने उलटूनही रस्ता अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 11:31 PM

नागरिक त्रस्त : सुरक्षेच्या उपाययोजनांकडेही पालिकेचे दुर्लक्ष

अंबरनाथ : पूर्व भागातील साई सेक्शन भागात काँक्रिटीकरणासाठी रस्ता बंद करून ठेवण्यात आला आहे. या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे या भागातील नागरिकांना त्या कामाचा त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी स्थानिकांच्या तक्रारी वाढत असतानाही पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. रस्त्याचे काम अर्धवट असून तेथे सुरक्षेची उपाययोजनाही केलेली नाही.

अंबरनाथ पूर्व भागातील कानसई या रहिवासी परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली होती. एकीकडे रस्त्यांची दुर्दशा असताना येथे भुयारी गटारांचे कामही करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यात हे रस्ते चालण्यायोग्यही राहिलेले नाहीत. नगरपालिकेने साई सेक्शन परिसरातील काही रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम चार महिन्यांपासून सुरू केले आहे. या रस्त्यांच्या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या भागातील रस्त्यांचे नियोजनही गुंतागुंतीचे असून एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी पर्यायी रस्ते दूर आहेत. ज्या रस्त्यांचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे, त्या कामांबाबत नगरपालिकेच्या अभियंत्यांसह ठेकेदाराने कुठलेही नियोजन केलेले नाही.

या भागात काही रस्त्यांचे काम अर्धवट अवस्थेत आहे, तर काहींचे काम एका बाजूने पूर्ण झाले आहे. दोन भागांतील रस्ते एकमेकांना अद्याप जोडण्यात आलेले नाहीत. एका ठिकाणी चार रस्ते येणाºया भागात रस्त्यांची जोडणी करण्यात ठेकेदाराला विसर पडला आहे. तसेच एकीकडे रस्ता पूर्ण झाला असल्याचे दिसत असले, तरी दुसºया टोकाला रस्ता अपूर्णावस्थेत आहे. तसेच या रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी नगरपालिका आणि रस्त्याचे काम करणाºया ठेकेदाराने काम सुरू असल्याचा फलक आणि सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे रात्री-अपरात्री येथे वाहन घेऊ न येणाºया वाहनचालकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

या भागात अनेक हॉस्पिटल असल्याने येथे येणाºया रुग्णांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. तसेच काम सुरू असलेले रस्ते अरुंद असल्याने अर्धवट रस्ता गाठल्यानंतर मागे फिरताना वाहनचालकांची चांगलीच अडचण होत आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करत सिमेंटचे रस्ते तयार करताना या कामात नियोजनाचा अभाव असून ठेकेदारावर नगरपालिका अभियंत्यांचे नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अर्धवट आणि रखडलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांची अडचण होत असून नगरपालिकेच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.रस्तेकामांची पाहणी करण्याचे आदेशरस्त्यांचे आणि कामाचे नियोजन नसल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची गरज व्यक्त होत आहे. तर, यासंदर्भात मुख्याधिकारी देविदास पवार यांनी रस्त्याच्या कामांबाबत अधिकाऱ्यांना पाहणी करून योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारroad safetyरस्ते सुरक्षा