शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

तीन तासांत आगीवर नियंत्रण; दोन लाख लीटर पाण्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 12:44 AM

अडीच हजार ली. फोमचा वापर; ५० जवानांचा समावेश

- पंकज राऊतबोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यात मंगळवारी संध्याकाळी लागलेली भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी विविध अग्निशमन दलाचे आठ बंब, ५० जवान आणि काही अधिकाऱ्यांनी तीन तास अत्यंत धोका पत्करुन झुंज दिली. ही आग विझवण्यासाठी जवळपास दोन लाख ली. पाणी तर अडीच हजार ली. फोमचा वापर करावा लागला.

औद्योगिक क्षेत्रातील हरशूल केमिकल्स प्रा.लि. (मे. श्री. साई एंटरप्राइजेस ) प्लॉट नं. टी १०१ या रासायनिक कारखान्याला आग लागल्याची वर्दी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या तारापूर येथील अग्निशामन दलाला मंगळवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मिळाली. त्यानंतर काहीच मिनिटांनी तारापूर अग्निशमन दलाची दोन वाहने प्रथम घटनास्थळी पोहोचली. तेव्हा कारखान्याच्या संपूर्ण परिसरात आग पसरली होती. आगीने रौद्ररूप धारण केले होते. तर ज्वलनशील रसायनांची भरलेली पिंपे फुटून आग अधिकच भडकत होती.

बघता बघता आग शेजारच्या केशवा आॅरगॅनिक कंपनीच्या काही भागापर्यंत पोहोचून मोठा धोका निर्माण झाला. अशावेळी सुरक्षेसाठी पाणी मारून, कुलिंग करून आग थोपवून धरल्याने तो कारखाना आगीपासून वाचवण्यात आला. असे असले तरी त्या कारखान्याची एअर हॅन्डलिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रिक केबल पूर्णपणे जळून गेल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. दुरुस्तीसाठी काही दिवस कारखाना बंद राहणार असून यात जवळपास एक कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे कारखान्याचे मालक डी. के. राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आग विझविण्यासाठी एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे ३, बी.ए.आर.सी., पालघर नगर परिषद, डहाणू अदाणी थर्मल पॉवर, डहाणू नगर परिषद, वसई - विरार महानगरपालिका यांच्या अग्निशमन दलाच्या प्रत्येकी एक अशा एकूण ८ गाड्या घटनास्थळी होत्या. त्यांना आठ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी उपस्थित होते. अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकाºयांएवढीच त्यांचीही भूमिका महत्त्वाची होती.

कारखान्यातील प्लास्टिक ड्रमचा वितळून लगदा केमिकल ट्रान्सफर करताना अर्थिंग दिली असताना स्पार्क होऊन आग लागल्याचे कंपनीच्या मालकांकडून अग्निशमन दलाच्या अधिकाºयांना सांगण्यात आले. या कारखान्यातील कच्च्या आणि पक्क्या मालासहकारखाना जळून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कारखान्याच्या मार्जिन स्पेसमधेच रसायनांनी भरलेली पिंपे असल्याने आग विझविण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यावर मात करून तारापूरअग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी मनीष सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी जीव धोक्यात घालून भीषण आग तीन तासात नियंत्रणात आणली. आगीत हा संपूर्ण कारखाना भस्मसात झाला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfireआगMaharashtraमहाराष्ट्र