शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

coronavirus: पालघर जिल्ह्याला मनुष्यबळ, निधी कमी पडू दिला जाणार नाही - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 1:46 AM

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम डहाणू तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा मृत्युदर १.३ टक्के असून औषधे व साहित्याबाबत प्रशासन स्वयंपूर्ण आहे. जिल्ह्यात एकही व्हेंटिलेटरचा वापर केला न गेल्याने पालघरमधील आशादायक चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसावे, अशी आपण प्रार्थना करीत असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालघर येथे सांगितले.गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम डहाणू तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासोबत बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्यातील आजाराची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत मृत्युदर कमी असून कोरोनाबाधितांच्या बरे होण्याच्या टक्केवारीबाबत समाधान व्यक्त केले. आरोग्य विभागाकडे ६० व्हेंटिलेटर असून एकाही व्हेंटिलेटरची गरज रुग्णाला भासली नसल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.जिल्ह्यात वसई, पालघर आदी दाटीवाटी असलेल्या भागात कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आल्याने स्वच्छ हवामान, प्रदूषण-विरहित हवामानाचा यावर काय परिणाम होतो का? याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना आपण दिल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. डायबेटीजचे रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असल्याचे मी मानत नाही, असे सांगून जिल्ह्यातील आशादायक असलेले चित्र आपल्या वृत्तपत्रात मांडा, असाही सल्ला आव्हाड यांनी या वेळी दिला.पालघर मध्ये उभे राहात असलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या इमारतीची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या असून मी त्या विभागाचा मंत्री अथवा पालघरचा पालकमंत्री नसल्याचे सांगून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालकमंत्री दादा भुसेंकडे अंगुलीनिर्देश केले. निकृष्ट दर्जाच्या इमारतीबाबत नामदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र दौरा करून या तक्रारींची शहानिशा करू, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार