शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:54 IST

महिनाभरात पाच जणांचा बळी : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्याचे काम सुरू

वसंत भोईर

वाडा : भिवंडी - वाडा - मनोर हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला असून पाच वर्षांमध्ये झालेल्या अपघातात तब्बल ४०० जणांना जीव गमवावा लागला आहे; तर अनेकजण जखमी झाले आहेत. खराब रस्ता, जागोजागी खड्डे, अपूर्ण काम यांमुळे हे अपघात होत असल्याचे सांगितले जाते.

मुंबई - अहमदाबाद आणि मुंबई - आग्रा या प्रमुख दोन रस्त्यांना जोडणारा दुवा म्हणून भिवंडी - वाडा - मनोर हा रस्ता ओळखला जातो. या महामार्गावरील वाढती वाहतूक तसेच वाड्यातील औद्योगीकरण लक्षात घेता राज्य शासनाने या रस्त्याच्या चौपदरीकरणाला पाच वर्षांपूर्वी मंजुरी दिली. हे रस्त्याचे काम ‘बांधा - वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर सुप्रीम कंपनीला देण्यात आले होते. मात्र, सुप्रीम कंपनीने पाच वर्षांत हे रस्त्याचे काम पूर्ण केले नाही. १६ कि.मी. अंतरावर वन विभागाच्या जागेत हा रस्ता अद्यापही दुपदरीच आहे तर देहजे, पिंजाळ नद्यांवरील पुलांची कामेही अपूर्ण आहेत.वाडा ते मनोर हा रस्ता बालाजी कंपनीने चांगला बनवला आहे. मात्र वाडा ते भिवंडी हा ४० कि.मी. अंतराचा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून प्रत्येक पावसात तो खड्डेमय होताना दिसतो. त्यावर थातूरमातूर डागडुजी केली जाते. पुन्हा पावसाळ्यात ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच स्थिती होते. या रस्त्याच्या अपूर्ण कामाकडे लक्ष वेधण्यासाठी पाच वर्षात अनेक आंदोलने झाली. मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नसल्याने आजही निष्पाप लोकांचे जीव जात असून संसार उघड्यावर पडले आहेत. यासाठी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, जिजाऊ सामाजिक संघटनेचे नीलेश सांबरे, श्रमजीवी संघटना, स्वाभिमान संघटना, मनसे यांनी अनेक वेळेला आंदोलने करून समस्येकडे लक्ष वेधले होते. पण आश्वासनांपलीकडे काहीही पदरात पडलेले नाही. नागरिकांचे हाल सुरूच आहेत. वास्तविक, न्यायालयाने सहा महिन्यात हा रस्ता करण्याचे आदेश दिले आहेत. त्या सहा महिन्यातीलही अडीच महिने आता निघून गेले आहेत.सद्यस्थितीत हा रस्ता सुप्रीम कंपनीकडून काढून घेतला असून टोलवसुली सुद्धा बंद आहे. या मार्गावरील खड्डे भरण्याचे काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. ते काम देखील कासवगतीने सुरू असल्याने त्याचा त्रास या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना होत आहे.काँक्रिटीकरणाचे काम सुरूच्१५० मीटर रस्त्याच्या कामासाठी पाच महिने गेले. कंचाड फाटा येथे एकशे पन्नास मीटर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. एप्रिल महिन्यात हे काम सुरू करण्यात आले पण आजपर्यंत ते पूर्ण झालेले नाही.राज्य महामार्गावर पडलेले खड्डे भरण्याचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल- प्रकाश पातकर,प्रभारी उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा

टॅग्स :Vasai Virarवसई विरारroad safetyरस्ते सुरक्षा