शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

बाडापोखरण पाणीयोजनेचा बोजवारा; जि.प.ची निष्क्रियता, भूमिपुत्र तहानलेले, पाणी मात्र इतर तालुक्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 03:58 IST

पालघर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पश्चिम किनारपट्टीवरील २९ गावे, पाड्यांतील महिलांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

- शौकत शेख ।डहाणू : पालघर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पश्चिम किनारपट्टीवरील २९ गावे, पाड्यांतील महिलांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्हयातील डहाणू, पालघर, तलासरी, विक्रमगड या तालुक्यांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या सूर्या प्रकल्पाचे पाणी मिरा-भार्इंदर आणि वसई-विरार या शहरी भागांकडे वळविले जात असतांना स्थानिक भूमीपुत्रांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांत कमालीचा असंतोष निर्माण झाला असून किनारपट्टीवरील ग्रामस्थांंनी पंचायत समितीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील लोकांना पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने माजी आमदार शंकर नम यांच्या प्रयत्नाने सन १९८९ ला बाडापोखरण प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु सन २००६ ला बाडापोखरण योजनेची जलवाहिनी, जलकुंभ, जीर्ण व जुनाट झाल्याने काँग्रेसचे माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नाने त्यावेळी काँग्रेसच्या सरकारने बाडापोखरण पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी ४३ कोटी ३९ लाख रूपये मंजूर केले.त्यानंतर येथील सुमारे ८५ किमीची जलवाहिनी बदलण्याचा कामाबरोबरोच ठिकठिकाणी नवीन जलकुंभ बांधण्यात आले. नूतनीकरणाचे काम सप्टेंबर २०१७ मध्ये पूर्ण होणार होते.परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे सहा महिने मुदतवाढ देऊनही काम पूर्ण झाले नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत.दरम्यान साखरे धरणाजवळ बाडापोखरण पाणीपुरवठा योजनेचा मोठा जलकुंभ आहे. या धरणातून पाणी त्यात चढवून त्यांचे शुध्दीकरण करून नंतर वाणगांव, चिंचणी, तारापूर, डहाणू, ओसार, तणासी, वाढवण इ. २९ गावांना तसेच परिसरातील खेडोपाडयांना नळाव्दारे ते पुरविले जाते. येथील नागरिकांना दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. दरम्यान बंदरपट्टी भागांत गेल्या आठ दिवसापसून पाणी सोडले जात असल्याने रहिवाशांचे त्यातही महिलांचे अत्यंत हाल सातत्याने होत आहेत.जनरेटरची गरजमहावितरणचा साखरे फिडर नेहमीच बे्रकडाऊन असल्याने तिथे जिल्हा परिषदेने जनरेटर बसविण्याची गरज आहे. परंतु प्रशासन केवळ पाणीपट्टी वसूलीचा एक कलमी कार्यक्रम राबवित असल्याने घराघरातील नळांना पाणी नाही. परंतु लोकांच्या डोळयात पाणी आले आहे. कारण गेले अनेक महिने या योजनेतून आठ आठ, पंधरा, दिवसाने एकदा पाणी पुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Damधरण