शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

बाडापोखरण पाणीयोजनेचा बोजवारा; जि.प.ची निष्क्रियता, भूमिपुत्र तहानलेले, पाणी मात्र इतर तालुक्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 03:58 IST

पालघर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पश्चिम किनारपट्टीवरील २९ गावे, पाड्यांतील महिलांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

- शौकत शेख ।डहाणू : पालघर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पश्चिम किनारपट्टीवरील २९ गावे, पाड्यांतील महिलांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्हयातील डहाणू, पालघर, तलासरी, विक्रमगड या तालुक्यांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या सूर्या प्रकल्पाचे पाणी मिरा-भार्इंदर आणि वसई-विरार या शहरी भागांकडे वळविले जात असतांना स्थानिक भूमीपुत्रांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांत कमालीचा असंतोष निर्माण झाला असून किनारपट्टीवरील ग्रामस्थांंनी पंचायत समितीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील लोकांना पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने माजी आमदार शंकर नम यांच्या प्रयत्नाने सन १९८९ ला बाडापोखरण प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु सन २००६ ला बाडापोखरण योजनेची जलवाहिनी, जलकुंभ, जीर्ण व जुनाट झाल्याने काँग्रेसचे माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नाने त्यावेळी काँग्रेसच्या सरकारने बाडापोखरण पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी ४३ कोटी ३९ लाख रूपये मंजूर केले.त्यानंतर येथील सुमारे ८५ किमीची जलवाहिनी बदलण्याचा कामाबरोबरोच ठिकठिकाणी नवीन जलकुंभ बांधण्यात आले. नूतनीकरणाचे काम सप्टेंबर २०१७ मध्ये पूर्ण होणार होते.परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे सहा महिने मुदतवाढ देऊनही काम पूर्ण झाले नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत.दरम्यान साखरे धरणाजवळ बाडापोखरण पाणीपुरवठा योजनेचा मोठा जलकुंभ आहे. या धरणातून पाणी त्यात चढवून त्यांचे शुध्दीकरण करून नंतर वाणगांव, चिंचणी, तारापूर, डहाणू, ओसार, तणासी, वाढवण इ. २९ गावांना तसेच परिसरातील खेडोपाडयांना नळाव्दारे ते पुरविले जाते. येथील नागरिकांना दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. दरम्यान बंदरपट्टी भागांत गेल्या आठ दिवसापसून पाणी सोडले जात असल्याने रहिवाशांचे त्यातही महिलांचे अत्यंत हाल सातत्याने होत आहेत.जनरेटरची गरजमहावितरणचा साखरे फिडर नेहमीच बे्रकडाऊन असल्याने तिथे जिल्हा परिषदेने जनरेटर बसविण्याची गरज आहे. परंतु प्रशासन केवळ पाणीपट्टी वसूलीचा एक कलमी कार्यक्रम राबवित असल्याने घराघरातील नळांना पाणी नाही. परंतु लोकांच्या डोळयात पाणी आले आहे. कारण गेले अनेक महिने या योजनेतून आठ आठ, पंधरा, दिवसाने एकदा पाणी पुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Damधरण