शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

बाडापोखरण पाणीयोजनेचा बोजवारा; जि.प.ची निष्क्रियता, भूमिपुत्र तहानलेले, पाणी मात्र इतर तालुक्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 03:58 IST

पालघर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पश्चिम किनारपट्टीवरील २९ गावे, पाड्यांतील महिलांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

- शौकत शेख ।डहाणू : पालघर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पश्चिम किनारपट्टीवरील २९ गावे, पाड्यांतील महिलांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्हयातील डहाणू, पालघर, तलासरी, विक्रमगड या तालुक्यांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या सूर्या प्रकल्पाचे पाणी मिरा-भार्इंदर आणि वसई-विरार या शहरी भागांकडे वळविले जात असतांना स्थानिक भूमीपुत्रांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांत कमालीचा असंतोष निर्माण झाला असून किनारपट्टीवरील ग्रामस्थांंनी पंचायत समितीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील लोकांना पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने माजी आमदार शंकर नम यांच्या प्रयत्नाने सन १९८९ ला बाडापोखरण प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु सन २००६ ला बाडापोखरण योजनेची जलवाहिनी, जलकुंभ, जीर्ण व जुनाट झाल्याने काँग्रेसचे माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नाने त्यावेळी काँग्रेसच्या सरकारने बाडापोखरण पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी ४३ कोटी ३९ लाख रूपये मंजूर केले.त्यानंतर येथील सुमारे ८५ किमीची जलवाहिनी बदलण्याचा कामाबरोबरोच ठिकठिकाणी नवीन जलकुंभ बांधण्यात आले. नूतनीकरणाचे काम सप्टेंबर २०१७ मध्ये पूर्ण होणार होते.परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे सहा महिने मुदतवाढ देऊनही काम पूर्ण झाले नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत.दरम्यान साखरे धरणाजवळ बाडापोखरण पाणीपुरवठा योजनेचा मोठा जलकुंभ आहे. या धरणातून पाणी त्यात चढवून त्यांचे शुध्दीकरण करून नंतर वाणगांव, चिंचणी, तारापूर, डहाणू, ओसार, तणासी, वाढवण इ. २९ गावांना तसेच परिसरातील खेडोपाडयांना नळाव्दारे ते पुरविले जाते. येथील नागरिकांना दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. दरम्यान बंदरपट्टी भागांत गेल्या आठ दिवसापसून पाणी सोडले जात असल्याने रहिवाशांचे त्यातही महिलांचे अत्यंत हाल सातत्याने होत आहेत.जनरेटरची गरजमहावितरणचा साखरे फिडर नेहमीच बे्रकडाऊन असल्याने तिथे जिल्हा परिषदेने जनरेटर बसविण्याची गरज आहे. परंतु प्रशासन केवळ पाणीपट्टी वसूलीचा एक कलमी कार्यक्रम राबवित असल्याने घराघरातील नळांना पाणी नाही. परंतु लोकांच्या डोळयात पाणी आले आहे. कारण गेले अनेक महिने या योजनेतून आठ आठ, पंधरा, दिवसाने एकदा पाणी पुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Damधरण