शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच बदल्या आता बिंदू नामावलीनुसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:04 IST

बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या विरोधात शिक्षकांनी न्यायालयात धाव दाद मागितली असता २२ जुलै २०१६चा शासन आदेश रद्द करून त्या आधीच्या २९ फेब्रुवारीच्या आदेशानुसार सर्वच जि.प. कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या विरोधात शिक्षकांनी न्यायालयात धाव दाद मागितली असता २२ जुलै २०१६चा शासन आदेश रद्द करून त्या आधीच्या २९ फेब्रुवारीच्या आदेशानुसार सर्वच जि.प. कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे ठाणे, पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांमधील शिक्षकांसह अन्य कर्मचाºयांच्या बदल्या आता बिंदु नामावलीप्रमाणेच कराव्या लागत आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग बदल्यांच्या याद्या करण्यात गुंतले आहेत.बिंदुनामावलीनुसार बदल्या नको असल्यामुळे शिक्षकांसह कर्मचाºयांनी राजकीय पुढाºयांव्दारे नवीन आदेश काढण्यात यश मिळवले होते. यामुळे मागील वर्षी २२ जुलैचा आदेश काढून त्यात कनिष्ठ कर्मचाºयांच्या बदलीला प्राधान्य दिले होते. यामुळे अन्याय झालेल्या काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने हा आदेश रद्द करून २९ फेब्रुवारीच्या आदेशानुसार सर्व कर्मचाºयांच्या बदल्या कराव्यात आदेश जारी केले. यामुळे आता शिक्षक, लिपीक, सेवक आदी सर्वांच्या बदल्या बिंदुनामावलीनुसार ठाणे व पालघर जिल्हा परिषदेला कराव्या लागत आहेत.ठाणे व पालघर जिल्ह्यात कर्मचारी संख्या समान ठेवण्यासाठी आता बिंदुनामावलीनुसार बदल्या करण्यासाठी दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे. या बिंदुनामावलीनुसार ठाणे जिल्ह्यातील सुमारे ३५० शिक्षकांच्या बदल्या पालघरला होणार आहेत, तर अन्य सुमारे ४७९ कर्मचारी या बदल्यांसाठी पात्र आहेत.आदिवासी क्षेत्रात काम करणे आवश्यक असल्यामुळे या बदल्यांमध्ये सेवानिवृत्तीस आलेल्या कर्मचाºयांचाही समावेश होत आहे. सुमारे २०० पेक्षा अधिक महिलांचाही यात समावेश आहे. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर पालघर जिल्हा अस्तित्वात आला. मात्र, नव्या पालघर जिल्ह्यासाठी रिक्त पदांवर अद्यापही भरती करण्यात आली नाही.अनेक कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती घेण्याच्या खटपटीतराज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये अध्यादेश काढून दोन्ही जिल्ह्यात समान पदे रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बिंदुनामावलीनुसार ठाणे जिल्ह्यातील ४७९ कर्मचाºयांच्या पालघरमध्ये बदल्या झाल्या आहेत. त्यातील बहूसंख्य कर्मचारी कल्याण ते बदलापूरपट्यातील रहिवासी आहेत. या बदल्यांमधून वय ५३ वर्षे, पती-पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजार, अपंग वगळण्यात आले. मात्र, माजी सैनिक व परित्यक्त्या, विधवा कर्मचाºयांचाही या बदल्यांमध्ये समावेश आहे. दररोजच्या किमान पाच ते सहा तासांच्या पालघरच्या प्रवासाला कंटाळून अनेक कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीच्या प्रयत्नात आहेत.