शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

यशोदा नदीचे होणार पुनरूज्जीवन

By admin | Updated: February 22, 2017 00:46 IST

सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले.

जलयुक्त शिवार अभियान : २०१६-१७ मध्ये २१४ गावांची निवड प्रशांत हेलोंडे   वर्धा सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले. आता २०१६-१७ साठी या अभियानात ‘यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्प’ राबविला जात आहे. यंदा २१४ गावांची निवड करण्यात आली असून ३३ गावांतील विविध कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीही आताच गावांची निवड करण्यात येणार आहे. सिंचनासह पिण्यायोग्य पाण्याच्या साठ्यात वाढ करणे, हे उद्दिष्ट यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये २०१५-१६ मध्ये कृषी विभागाकडून २१३ गावांतील कामे हाती घेण्यात आली होती. यातील २ हजार ९९३ कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे ४०० कामे प्रलंबित राहिली होती. यातील निधी प्राप्त झाल्यामुळे २०० कामे सुरू झाली आहेत. यात ढाळीचे बांध बाधणे, नाला खोलीकरण आदी कामांचा समावे आहे. शिवाय याच अभियानांतर्गत ‘एरीया ट्रीटमेंट’ची कामेही करण्यात आली. सुमारे ५८ हजार १०७ हेक्टरवर ही कामे करण्यात आलीत. यात पाणी रोखून जमिनीत मुरविले जाते. या पद्धतीमुळे माती वाहून जात नाही. परिणामी, जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. गतवर्षी नाला खोलीकरणाची ५२७ कामे झाली. यात ११० किमीपर्यंत सुमारे ९६६० सहस्त्र घनमीटर पाणी साठविण्यात आले आहे. धरणे, प्रकल्प जेथे पोहोचू शकत नाही, अशा गावांची निवड करून हे अभियान राबविले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानसाठी निवडलेल्या गावात सर्व कामे पूर्ण झाली पाहिजे, या उद्देशाने कृषी विभागाकडून कामे केली जात आहेत. जुन्या सिमेंटच्या नाला बांधाच्या ठिकाणी खोलीकरणाच्या कामांना यात प्राधान्य दिले जात आहे. २५३ जुन्या नाला बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. यासाठी महात्मा फुले जलभूमी अभियानाचा निधी वापरण्यात आला आहे. गतवर्षी झालेल्या या कामांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून सिंचन क्षेत्रात वाढ झाली. आता २०१६-१७ मध्ये २१४ गावांमध्ये विविध कामे सुरू करण्यात आलीत. यातील यशोदा नदीच्या काठावरील गावांत ३३ कामे सुरू करण्यात येणार आहे. खोलीकरणासह ढाळीचे बांध बांधले जाणार असून मृत जलस्त्रोत जिवंत करण्यात येणार आहे. खोलीकरणाची ३६३ कामे करण्यात येणार असून यासाठी बजाज फाऊंडेशनचे सहकार्य लाभणार आहे. उगम ते संगम पद्धतीने यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्प राबविला जात आहे. यामुळे नदी काठावरील तसेच काही किमी अंतरातील पाण्याची पातळी वाढणार आहे. परिणामी, सिंचन क्षमतेतही वाढ होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानमुळे शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत नाही. खरीप तसेच रबी हंगामातील पिकांनाही याद्वारे जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळेच यंदा रबी हंगामातील पीक क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले. यावर्षीची कामे पूर्ण झाल्यानंतर सिंचन क्षमतेत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिवाय यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्पामुळे काही प्रमाणात पाणीटंचाईची समस्याही मार्गी लागणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.