शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील मजूर आले वर्ध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातच परतीच्या पावसानेही दणका दिल्यामुळे कपाशीचे बोंड फुटायला उशीर लागला. आता सर्वत्रच कापूस वेचणीला सुरुवात झाली असल्याने गावांमध्ये मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावातील मजुरांचेही दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखीच भर पडली आहे.

ठळक मुद्देरोजगारासाठी स्थलांतरण : परिवार कापूस वेचणीत व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात बसल्याने शेतमजुरांचा रोजगारही हिरावला आहे. त्यामुळे तेथील मजुरांनी पोटाची खळगी भरण्याकरिता आता आपला मोर्चा वर्धा जिल्ह्याकडे वळविला आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शंभरावर परिवार दाखल झाले असून कापूस वेचणीच्या कामात व्यस्त असल्याने मजुरांचा प्रश्न आता सुटला आहे.खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातच परतीच्या पावसानेही दणका दिल्यामुळे कपाशीचे बोंड फुटायला उशीर लागला. आता सर्वत्रच कापूस वेचणीला सुरुवात झाली असल्याने गावांमध्ये मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावातील मजुरांचेही दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखीच भर पडली आहे. अशातच हाताला काम नसलेल्या पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यासह इतरही भागातील मजूर कुटुंबीय सेवाग्राम नजिकच्या तुळजापूर गावासह जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या टोळ्या गावातच मिळेल त्यांच्याकडे आसरा घेऊन राहात असल्याने शेतकऱ्यांना मजुरांचा प्रश्न मिटला असून कापूस वेचणीला जोर आला आहे. आता बाहेर जिल्ह्यातून आलेले मजूर सकाळपासूनच कामाला लागत असून त्यांना १४० रुपये मनकी (दहा किलो) मजुरी दिली जात असल्याने गावातील मजुरांचे दरही आवाक्यात आले आहेत. या मजुरांमुळे शेतकऱ्यांची अडचण बऱ्या प्रमाणात सुटली असून आता हे मजूर उलंगवाडी होईपर्यंत इकडेच वास्तव्यास राहणार आहे.शेतकरीच करतात राहण्याची व्यवस्थाविदर्भाच पांढर सोनं असलेल्या कापसाने यावर्षी शेतकºयांचे आर्थिक बजेटच बिघडविले आहे. यावर्षी पºहाटी पाच ते सहा फूट उंच वाढली असली तरी बोंडं मात्र वीसच्या आतच दिसून येत आहेत. त्यामुळे एक-दोन वेच्यातच उलंगवाडी होण्याची चिन्हे आहेत. यामुळे उत्पादनातही कमालीची घट झाली असताना मजुरांच्या कमतरतेमुळे वाढीव दर देण्याचा भारही शेतकऱ्यांवर पडला आहे. रोजगाराच्या शोधात जिल्ह्याबाहेरील मजूर दाखल झाल्याने शेतकऱ्यांचा हा भार कमी झाला आहे. बाहेरगावावरून आलेल्या मजुरांची राहण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनीच केली तर काहींनी गावात पाल टाकून आसरा घेतला आहे.

टॅग्स :Labourकामगार