शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाने शेतकरी वैतागले

By admin | Updated: July 2, 2014 23:24 IST

तालुक्यातील काही भागात अघोषित भारनियमनाने शेतकऱ्यांना वैतागून सोडले आहे. पाऊस येईल या आशेवर लावलेल्या बियाण्याचे अंकुर उगविण्याआधीच करपले आहे. ओलिताची सोय आहे;

सेलू : तालुक्यातील काही भागात अघोषित भारनियमनाने शेतकऱ्यांना वैतागून सोडले आहे. पाऊस येईल या आशेवर लावलेल्या बियाण्याचे अंकुर उगविण्याआधीच करपले आहे. ओलिताची सोय आहे; मात्र शेतातील मोटारपंप मनमानी भारनियमनाने सतत तासभरही चालत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.कान्हापूर - रमणा परिसरातील शेतकरी सध्या रडकुंडीला आले आहे. पाऊस गायब झाला आहे. प्रचंड उकाडा आहे. लावलेले कपाशीचे बियाणे जगविण्यासाठी ओलिताची सोय असूनही पिकांना पाणी देता येत नाही. शेतकऱ्यांनी मोटारपंप चालू केला व तो दुसऱ्या कामात लागला की काही वेळातच वीज जाते. पुन्हा काही वेळात येते. या हुलकावणीमुळे शेतात लावलेले ठिबक व स्प्रिंंकलर धड काम करीत नाही. प्रत्येक वेळी वीज गेल्यावर पुन्हा-पुन्हा मोटारपंप चालू करण्याची वेळ येते. या कटकटीमुळे पाण्याची सोय असूनही अनेकांनी स्प्रिंकलर व ठिंबक संच लावलेच नाही. ज्यांनी लावले त्यांची योग्य ओलित होत नाही. त्यामुळे अंकुरलेले रोपटे करपून जात आहे. पोटाला चिमटा काढून तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकांची काळजी शेतकरी घेत आहे. पण वीजभारनियमनामुळे प्रचंड आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. काही भागात चार दिवस सकाळी आणि तीन दिवस रात्री वीज नसते. त्यामुळे रात्ररात्र शेतकरी वर्गाला शेतात थांबाबे लागत आहे. कान्हपूर-रमणा येथील शेतकरी तुकाराम गरड यांनी डोळ्यात आसवे आणून सर्व शेतकऱ्यांचे होत असलेले हाल ‘लोकमत’जवळ कथन केले. वीज वितरण कंपनीच्या मनमानीपणामुळे भारनियमनाचे ऐच्छिक वेळापत्रक तयार करण्यात आले की काय? असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. दिवसातून धड दोन तासही सतत वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे त्रस्त झाले आहे. मोटारपंप चालू करूनही धड ओलीत होत नसल्याने हातचे पीक जावून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.जमिनीतून बाहेर आलेल्या अंकुरांना पाण्याची गरज आहे. वीज कंपनीने सद्या अघोषित भारनियमन थांबवावे व शेतकऱ्यांचे पीक वाचविण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. प्रशासनापासून ही बाब लपलेली नाही. परंतु लक्ष दिले जात नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन भारनियमन थांबवावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)