शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

तोडलेला बंधारा दीड वर्र्षांपासून दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 10, 2016 02:17 IST

वायगाव ते सोनेगाव (बाई) मार्गावर भदाडी नदीवर काही वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा या भागातील एका धनिक...

कार्यवाही शून्य : स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षवायगाव (नि.) : वायगाव ते सोनेगाव (बाई) मार्गावर भदाडी नदीवर काही वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा या भागातील एका धनिक शेतकऱ्याने एक ते दीड वर्षापूर्वी तोडला; पण लोकप्रतिनिधींनी त्या धनाढ्य शेतकऱ्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. शिवाय त्या बंधाऱ्याची साधी डागडुजीही करण्यात आली नाही. संबंधित अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने तुटलेल्या बंधाऱ्याला दीड वर्षांपासून दुरूस्तीची प्रतीक्षा कायम आहे.बंधारा तोडल्या प्रकरणी त्या धनिक शेतकऱ्यावर कार्यवाही का केली नाही, हे एक कोडेच आहे. सदर शेतकऱ्याने एक-दोन वर्षांपूर्वीच शेत विकत घेतल्याची चर्चा आहे. या बंधाऱ्यामुळे त्याच्या शेतात पाणी जाण्याची भीती असल्याने त्याने तो तोडल्याची माहिती आहे. बंधारा तुटल्याने येथील शेतकऱ्यांच्या ओलिताची समस्या निर्माण झाली आहे. गत एक ते दीड वर्षापासून कुठलीही कार्यवाही न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.वायगाव ते सोनेगाव मार्गावरील भदाडी नदीवर भूजल विभागाने २००५-०६ च्या सुमारास सिमेंटचा पक्का बंधारा बांधला होता. या बंधाऱ्यामुळे ग्रा.पं. नळयोजनेच्या विहिरीला पाणी वाढले होते. सोबतच शेतातील विहिरीची पातळी वाढण्यास मदत झाली होती. या भागातील शेतकऱ्यांना ओलिताचीही सोय झाली होती. हा बंधारा बांधल्यानंतर तो ग्रा.पं. कडे हस्तांतरीत करण्यात आला. शासन पाणी अडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवारावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे; पण एक शेतकरी कुठलीही परवानगी न घेता बंधारा फोडतो, त्याच्यावर एक-दीड वर्षे होऊनही कार्यवाही होत नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल. ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करताच घटनास्थळावर अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी पोहोचले होते; पण कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. साधी डागडुजीही करण्यात आली नाही. वायगाव येथील ग्रामपंचायतीसह सर्व लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे आहेत. याच पक्षामार्फत जलयुक्त शिवार योजना जोमाने सुरू आहे; पण तोडलेला बंधारा दुरूस्त केला जात नसल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे. हा बंधारा दुरूस्त करावा, अशी मागणी अनेकदा येथील शेतकऱ्यांनी वायगाव ग्रा.पं. कडे केली; पण तो बंधारा ग्रा.पं. कडे नसल्याचेच सांगितले जात आहे. भूजल विभागाला विचारणा केली असता ग्रा.पं. ला हस्तांतरीत केल्याचे सांगण्यात येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)