शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी रस्त्यालाही जाताहेत तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:26 IST

सेवाग्राम विकास आरखड्यातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. परंतु, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता आणि दुर्लक्षित धोरणामुळे अल्पावधीतच नागरिकांकडून सदोषतेचा ठपका ठेवला जात आहे. यातून व्हीआयपी रस्त्याही सुटला नाही. मागील पाच ते सहा दिवसांपासून या सिमेंट रस्त्यावर पाणी टाकले नसल्याने काम पूर्ण होण्यापूर्वीच काही ठिकाणी तडे गेल्याची ओरड होत आहे.

ठळक मुद्देपाण्याचा अभाव : सदोष बांधकामाची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम विकास आरखड्यातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. परंतु, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता आणि दुर्लक्षित धोरणामुळे अल्पावधीतच नागरिकांकडून सदोषतेचा ठपका ठेवला जात आहे. यातून व्हीआयपी रस्त्याही सुटला नाही. मागील पाच ते सहा दिवसांपासून या सिमेंट रस्त्यावर पाणी टाकले नसल्याने काम पूर्ण होण्यापूर्वीच काही ठिकाणी तडे गेल्याची ओरड होत आहे.स्थानिक शासकीय विश्रामगृहालगतच्या व्हीआयपी रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत सुरू आहे. दोन कोटी रुपयांच्या निधीतून नालवाडी चौकापर्यंत या रस्त्याचे सिमेंंटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा कंत्राट जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतला असून प्रत्यक्ष काम मात्र स्थानिक कंत्राटदाराकडून केले जात आहे. या रस्त्याच्या काही भागाचे सिमेंटीकरण झाले असून त्यावर पाणी मुरविण्याकरिता पोते झाकण्यात आले आहे. मात्र, मागील पाच ते सहा दिवसांपासून यावर पाणी टाकण्यात आले नसल्यामुळे अल्पावधीतच या रस्त्याला जागोजागी तडे गेल्याने बांधकाम सदोष झाल्याची ओरड स्थानिकांकडून केली जात आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया या व्हीआयपी मार्गाच्या बांधकामावर वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.दुष्काळातही सिमेंटीकरणाचा सपाटासर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्ध्यासह लगतच्या सर्व गावात पाणीबाणी निर्माण झाली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दहा गावांचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. शहरासाठीही दहा दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याने मोठी पंचाईत होणार आहे. असे असतानाही सिमेंटीकरणाच्या कामाचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याची पाण्याची आवश्यकता कशी पूर्ण केली जाईल? पाण्याअभावी कोट्यवधीच्या खर्चातून बांधलेल्या रस्त्यांची अल्पावधीच वाट लागणार आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत या सिमेंटीकरणावर निधीची उधळपट्टी कशासाठी? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे.