शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
8
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
9
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
10
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
11
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
12
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
13
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
14
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
15
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
16
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
20
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

वळण रस्ता झाला धोक्याचा

By admin | Updated: November 13, 2016 00:53 IST

नागपूरवरून यवतमाळकडे जाणारी जडवाहतूक शहराबाहेरुन काढण्यासाठी वळणरस्ता तयार करण्यात आला.

दुरुस्तीचे वावडे : खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळणी
वर्धा : नागपूरवरून यवतमाळकडे जाणारी जडवाहतूक शहराबाहेरुन काढण्यासाठी वळणरस्ता तयार करण्यात आला. अवजड वाहनांना थेट शहरातून प्रवेश न देता पवनार-वर्धा मार्गावरील दत्तपूर परिसरातून बायपास काढून वाहतूक वळती केली. त्यामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी झाला. जडवाहनांसह शहरातील वाहनधारकांकडून या रस्त्याचा उपयोग केला जातो. सध्या या मार्गावर वर्दळ वाढली आहे. मात्र या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली असून ही बाब अपघाताचे कारण ठरत आहे.
पूर्वी नागपूरवरून येणारी जडवाहने शहरातील मुख्य मार्गाने जात होती. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. ही अडचण दूर करण्यासाठी दत्तपूर परिसरातून बायपास मार्ग तयार करण्यात आला. या मार्गाने नागपूरवरून यवतमाळकडे जाणारी जडवाहने वळती करण्यात आली. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा भार कमी झाला. सध्या या मार्गावरून दररोज शेकडो जडवाहने धावतात. यासह रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरी वसाहतीतील वाहतूक येथूनच होते. दुचाकी व कार यासारख्या वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. मात्र त्याची डागडुजी केली नाही. त्यामुळे रस्त्याची अत्यंत दैना झाली आहे. वळणरस्ता असल्याने वाहने भरधाव धावतात. अशात जडवाहनांचे चालक खड्ड्यांचा विचार करीत नाही. अनेकदा वाहनाचे टायर पंक्चर होतात. दुचाकी, कार या वाहनांचे चालक खड्ड्यांना चुकविण्याचा प्रयत्नात अपघात होतात.
या खड्ड्यांमुळे या मार्गाने रात्रीची होणारी वाहतूक धोकादायक झाली आहे.
जडवाहतुकीसह प्रवासी वाहतूकही या मार्गाने होते. अशावेळी या खड्ड्यांंमुळे प्रवाशांना यातनामय प्रवास करावा लागतो. प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांची दैना होते. याबाबत अनेकदा आंदोलने झालीत. रस्त्यावर बेशरमाची झाडेही लावण्यात आली होती. याउपरही संबंधित विभागाने याची दखल घेतली नाही.(स्थानिक प्रतिनिधी)

रस्त्याच्या कडा खचल्याने वाहनांमध्ये होतो बिघाड
या वळणरस्त्याचा वापर शहरातील मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमातील उरलेले अन्न टाकण्यासाठी केला जातो. तसेच येथे कचरा टाकण्यात येतो. काही सामाजिक संघटनांनी येथे सफाई मोहीम राबविली. येथे कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आल्यानंतर हा प्रकार सुरू आहे.
हे शिळे अन्न खाण्यासाठी कुत्रे, गाय, म्हशी आदी जनावरे येथे भटकत असतात. अशावेळी एखादे भरधाव वाहन आल्यास नाहक ही जनावरे वाहनाखाली चिरडली जातात. परिसरात जनावरे सडल्याने दुर्गंधी पसरते.
या रस्त्याने ये-जा करताना परिणामी जनावरांना चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात झाले आहे.

या मार्गावर जुनापाणी चौक परिसरात रस्ता उखडला आहे. तसेच उर्वरीत भागात खोल खड्डे पडले आहे. रस्त्यावील खड्डे चुकविण्यासाठी जडवाहने रस्त्याच्या कडेने वाहन घेऊन जातात. परिणामी यात रस्त्याच्या कडा खचत आहे. रस्त्याची अत्यंत दैना झाली आहे.
उरलेले अन्न रस्त्याच्या कडेला टाकले जात असल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे असे अन्न टाकण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाने या खड्ड्यांची त्वरीत डागडुजी करावी अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक करीत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात बळावले आहे.
या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती कोणाकडे आहे याबाबत संभ्रम असल्याने याची डागडुजी होत नसल्याचे दिसते. यासाठी निधी आला नसल्याचे सबंधीत विभागाकडून सांगण्यात येते.