शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
3
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
4
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
5
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
6
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
7
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
8
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
9
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
10
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
11
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
12
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
13
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
14
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
17
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
18
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
19
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
20
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाने केली दुष्काळ भागाची पाहणी

By admin | Updated: June 4, 2016 01:54 IST

२०१५ मधील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जाम गावातील शेतकऱ्यांनी मांडली आपली कैफियत
वर्धा : २०१५ मधील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना केंद्रशासनामार्फत मदत मिळावी यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलो असल्याचे केंद्रशासनाच्या निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद यांनी समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे शेतकऱ्यांशी चर्चा करताना सांगितले.
समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत सभागृहात केंद्र शासनाच्या दुष्काळ पाहणी पथकातील सदस्य असलेले निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद, केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे अवर सचिव रामा वर्मा, जलसंसाधन विभागाचे उपसंचालक मिलिंद पानपाटील, ए.जी. एम.एफ. सी.आय. मुंबईचे एम.एम. बोराडे, डायरेक्टर सेट्रल इलेक्ट्रीसिटीचे जे.के. राठोड यांनी जाम गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी गावात पिण्याचे पाणी आहे का? मागच्या वर्षी किती टक्के उत्पादन झाले, पीक पेरणी व इतर खर्च आणि उत्पादन किती झाले, आणेवारी ५० टक्केच्या आत आहे का याबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी डॉ. रामानंद यांनी जाम येथील शेतकरी अमोल जांभळीकर यांच्याकडून मागच्या वर्षी झालेल्या उत्पादनाबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी जांभळीकर यांनी सांगितले की, माझ्याकडे दहा एकर शेती आहे. २०१५ मध्ये खरीप हंगामात मी कापूस, सोयाबीन व तुरीचा पेरा केला होता. त्यासाठी पाच लाख रूपये खर्च केले. पण उत्पन्न दोन लाखही आलेले नाही. त्यामुळे शेतकरी खुप अडचणीत आहे. अवधूत सोमल, अजय पिटे या शेतकऱ्यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पथकातील पाचही सदस्यांनी जाम गावातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. केंद्र शासनाच्या कृषी विभागांच्या योजनांचा आपल्याला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
काही शेतकऱ्यांनी कैफियत मांडतांना सांगितले की, खरीप हंगाम गेल्यावर रब्बी हंगाम चांगला होईल या आशेवर शेतकऱ्यांनी रब्बीचा पेरा केला. पण हातातोंडाशी घास आला असताना अचानक गारपीट आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झालेला असून त्याला शासकीय मदतीची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे शेतकऱ्यांनी पथकाला सांगितले.
काही शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवारांची कामे या परिसरात सुरू करण्याची मागणी केली. तसेच पिकांचे नीलगायीपासून नुकसान होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही त्यांनी पथकाकडे केली. या पथकासोबत अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, समुद्रपूरचे तहसीलदार सचिन यादव, हिंगणघाटचे तहसीलदार दीपक कारंडे, कृषी सहसंचालक विजय घावडे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. भारती आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)