शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह पावसाचा उभ्या पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

वादळी वाऱ्यासह पावसामुळे पवनार परिसरातील केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी आ. भोयर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे रसुलाबाद परिसरातील शेतकºयांची एकच तारांबळ उडाली होती. विजांचा कडकडाट सुरू असल्याने रसुलाबाद येथील मंगेश माधव भलमे याने बाऱ्हा सोनेगाव भागातील शेतातील गोठ्यात आश्रय घेतला.

ठळक मुद्देएक जखमी : नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मध्यरात्री आणि रविवारी पहाटे वर्धा जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाºयासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे उभ्या पिकांचा चांगलाच फटका बसला आहे. रसुलाबाद परिसरात वीज पडल्याने एक व्यक्ती जखमी झाला. तर चिकणी जामणी परिसरात तुरीच्या आकाराची गार पडली. अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तातडीने सर्वेक्षण करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.वादळी वाऱ्यासह पावसामुळे पवनार परिसरातील केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी आ. भोयर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे रसुलाबाद परिसरातील शेतकºयांची एकच तारांबळ उडाली होती. विजांचा कडकडाट सुरू असल्याने रसुलाबाद येथील मंगेश माधव भलमे याने बाऱ्हा सोनेगाव भागातील शेतातील गोठ्यात आश्रय घेतला. अशातच वीज पडल्याने मंगेश जखमी झाला. त्याला सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चिकणी जामणी परिसरात वादळी वाऱ्यासह तुरीच्या आकाराच्या गारांचा पाऊस झाला. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सेवाग्राम भागात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. तर रविवारी सकाळी पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले.दहा गोठ्यांवरील छत उडालेकोरा : अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे परिसरातील दहा गोठ्यांवरील टिनपत्रे उडाले. तर काही पाळीव जनावरे जखमी झाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांचे वैरण पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांचा चांगलाच फटका बसला आहे. प्रफुल पंढरे यांच्या शेतातील गोठ्यावरील टिना उडाल्या. शिवाय गोठ्यातील ३२ क्विंटल कापूस, चार क्विंटल चणा तसेच जनावरांचा चारा भिजला. तसेच काशिनाथ पंढरे, नारायण पडवे यांच्या मालकीची जनावरे जखमी झाली. जीतेंद्र पंढरे, राजू पंढरे, गजू पंढरे, प्रमोद पंढरे, बंडू पंढरे, आत्माराम सुर्यवंशी, हरिभाऊ गुंडे, कमला पडवे यांच्या शेतातील गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच तलाठी सुरजूसे तसेच सुभाष लोखंडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.वीज पडून बैलजोडी दगावलीसेवाग्राम : वादळीवाऱ्यासह पावसादरम्यान वीज पडून बैलजोडी दगावली. ही घटना रविवारी सकाळी नजीकच्या जऊळगाव शिवारात घडली. बैलजोडी दगावल्याने शेतकरी रमेश झिलपे यांचे १ लाखांचे नुकसान झाले आहे. रमेश झिलपे यांनी त्यांच्या मालकीची बैलजोडी शेतात बांधून ठेवली होती. दरम्यान ही घटना घडली.नंदोरी परिसरात झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वादळीवाऱ्यासह पावसामुळे गहू, चणा, हळद पिकाला चांगलाच फटका बसला आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :Rainपाऊस