शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

सेलू तालुक्याला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : परिसरात एक दिवसापूर्वीच वादळाने कहर करून शेतकऱ्यांच्या केळीच्या बागासह घरावरील छत, झाडे सपाट करीत ...

ठळक मुद्देवीजतारा, झाडे उन्मळूृन पडली, अनेक घरे व गोठ्यांवरील टिनपत्रेही उडाली

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : परिसरात एक दिवसापूर्वीच वादळाने कहर करून शेतकऱ्यांच्या केळीच्या बागासह घरावरील छत, झाडे सपाट करीत लाखोंची हानी केली. पुन्हा एकाच दिवसाच्या फरकाने आलेल्या सुसाट चक्रीवादळाने उर्वरित केळी पिकांची वाट लागली. घरावरील छत, टिनपत्रे दूरपर्यंत उडून गुले. रस्त्याच्या कडेला असलेला एक लोखंडी पानठेला २०० मीटर उडून गेला. सेलू, बेलगाव व आजूबाजूच्या काही गावांना मोठा फटका बसला. इतरही गावात वादळाने मोठे नुकसान केले. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिल्याच वादळातील तुटलेला वीजतारा खांब सुरळीत करतांना त्रेधातिरपीट उडाली तर पुन्हा वादळाने वीजतारा तुटला व खांब वाकल्याने त्यांचे हाल सुरू आहे.आंजी (मोठी) येथे विजेवरील उपकरणे निकामीआंजी (मोठी) : शनिवारी रात्री विजेचा कडकडाट व वादळी वाºयासह पाऊस झाला. विजेच्या कडकडाटामुळे वॉर्ड क्रमांक दोनमधील दीपक वनवे यांच्याकडील कॅमेरा, डीव्हीआर, दूरचित्रवाणी संच, सेटटॉप बॉक्स आणि दिवे, शिव डोंगरे यांच्याकडील दूरचित्रवाणी संच निकामी झाले. तर निखिल मिसाळ यांच्याकडील लाईट व पंखे जळाले. यामुळे संबंधितांचे नुकसान झाले.घोराडात वादळवारा, गारपीटघोराड : सतत येत असलेले वादळी वारे पुन्हा एकदा शनिवारी मध्यरात्री धडकल्याने शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागले. शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या वादळी वाºयासह झालेला पाऊस आणि गारपिटीने शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. शनिवारी कृषी विभागाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. हा अहवाल शासन दप्तरी तयार होणार, तोच शनिवारी रात्री ११.४५ ला वादळीवाºयाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटाने सर्वांची झोप उडविली. एक तासाहून अधिक काळ वादळाचे थैमान सुरू होते. दरम्यान अनेकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडाले. शेतातील गोठ्यांची पडझड झाली. केळीच्या पानांची दुर्दशा झाली. आता काही जण केळी उपटून पºहाटी लावण्याचा मार्ग शोधत आहे. सतत झालेल्या वादळवाºयामुळे वीज वितरण कर्मचाºयांची तारांबळ उडत आहे. शेतातील कृषिपंप सुरू करायचे की, गावातील वीजपुरवठा सुरळीत करावा, असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. वीज वितरण घोराड शाखेअंतर्गत सुकळी, कोटंबा, घोराड, मोही असा विस्तीर्ण परिसर आहे. वीज कर्मचाºयांची कमतरता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचणीची ठरत आहे. वाकलेले खांब व तुटलेल्या तारा जोडण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असल्याने शेतातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वादळी वाºयासह पावसाने गावखेड्यातील पाणीपुरवठा प्रभावित होत आहे. 

टॅग्स :Rainपाऊस