शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

अडीच एकरात एक पोतं सोयाबीन

By admin | Updated: November 27, 2014 23:39 IST

निसर्गाची अवकृपा झाली. पेरलेले शेतातच गेले. सोयाबीन सवंगण्याचीही गरज पडली नाही. पाण्याअभावी कपाशीवर लाल्याने आक्रमण केले़ तूर जंगली श्वापदांनी फस्त केली. हातात पैसा नाही,

नापिकीग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा : कपाशीवरही लाल्याचे आक्रमण
विरूळ (आ़) : निसर्गाची अवकृपा झाली. पेरलेले शेतातच गेले. सोयाबीन सवंगण्याचीही गरज पडली नाही. पाण्याअभावी कपाशीवर लाल्याने आक्रमण केले़ तूर जंगली श्वापदांनी फस्त केली. हातात पैसा नाही, पोटात टाकण्याकरिता दाना नाही, हे वास्तव आहे, येथील डोंगराच्या कुशीत बसलेल्या गावांचे़ या गावांची व्यथा शासनदरबारी महिती असताना कुणीच या भागात फिरकत नाही. नापिकीने गावातील पूर्ण सुख हरविल्याचे भयानक वास्तव येथे पाहावयास मिळते.
डोंगराच्या कुशीत वसलेल्या सालधरा, काकडधरा, बोरी-बारा, खैरी, चिकटी, पाचोड, कृष्णापूर, रामपूर या गावांतील काही शेतकऱ्यांजवळ दोन ते तीन एकर कोरडवाहू शेती आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले; पण निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन सवंगण्याची गरज भासली नाही. एका शेतकऱ्याला अडीच एकरात केवळ एकच पोतं सोयाबीन झाले. सर्वच शेतकऱ्यांची अशीच स्थिती आहे. कपाशी आहे; पण त्यावर लाल्याचे आक्रमण झाले. आदिवासी भाग असलेल्या या गावातील हे विदारक वास्तव आहे. या गावातील शेतकरी एकेका दाण्याकरिता महाग झाला आहे. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सोयाबीन सवंगायचे कामच पडले नाही़ घरात जेवढा कापूस होता, तो बेभाव विकला, अन् घरात खाण्याकरिता अन्नाचा दाणा आणला. हाताला काम नाही, गावात दुसरे उत्पन्नाचे साधन नाही, आम्ही जगावे कसे... अशी हृदय हेलवणारी वाक्ये येथील शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात़
सोयाबीन पीक झाले नाही. कपाशी पाण्याअभावी व लाल्याच्या आक्रमणामुळे वाळली. तुरीचे पीक जंगली श्वापदांनी फस्त केले. यामुळे नापिकीने शेतकरी पुरता गंजला आहे़ काहींच्या घरात तर अन्नाचा कणही नाही. धान्य आणण्यासाठी घरात असले नसले साहित्य विकून वा गहाण ठेवून आपली उपजीविका चालवावी लागत आहे. चिल्या-पिल्यांचे पोट भरण्यासाठी चाललेल्या या खटाटोपांतून ते या दुष्काळाचा सामना करीत आहेत. कधीकाळी हिरवागार राहणारा हा परिसर गत काही वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत आहे़ ही बाब शासन दरबारी माहिती असताना कुणी तिकडे ढुंकून पाहत नसल्याचे दिसते़ यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागावी, हाच खरा प्रश्न आहे़(वार्ताहर)