शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
2
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
3
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
4
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
5
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
6
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
7
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
8
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
9
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
11
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
12
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
13
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
14
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
15
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
16
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
17
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
18
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
19
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
20
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा

‘त्या’ तिघांचा अहवाल ‘निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 5:00 AM

कोरोना बाधित क्षेत्रातून वर्धा जिल्ह्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत कोरोना बाधित क्षेत्रातून १०९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यात आल्याची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. त्यापैकी ५४ व्यक्तींची रविवारपर्यंत होम क्वारंटाईन मधून सुटका करण्यात आली होती. तर सोमवारी आणखी २० व्यक्तींना होम क्वारंटाईन मधून मुक्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसावधगिरी बाळगणे क्रमप्राप्त; पण बेफिकर दिसताहेय वर्धेकर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विविध कार्य युद्धपातळीवर केले जात आहेत. यापूर्वी चार व्यक्तींचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर रविवारी आणखी तीन संशयीतांचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. सदर अहवालानुसार प्रकृती अस्थिर असलेले हे तिन्ही व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.कोरोना बाधित क्षेत्रातून वर्धा जिल्ह्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत कोरोना बाधित क्षेत्रातून १०९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यात आल्याची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. त्यापैकी ५४ व्यक्तींची रविवारपर्यंत होम क्वारंटाईन मधून सुटका करण्यात आली होती. तर सोमवारी आणखी २० व्यक्तींना होम क्वारंटाईन मधून मुक्त करण्यात आले आहे. तर उर्वरित ३५ व्यक्ती सध्या गृह निगराणी (होम क्वारंटाईन) मध्ये आहेत. त्यांच्यात कोरोनाची कुठली लक्षणे आढळतात काय यावर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. सुरूवातीला चार व्यक्तींच्या घशातील द्रवासह रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले. तर रविवारी आणखी तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तेही निगेटिव्ह आले आहे. एकूणच वर्धा जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शिवाय जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. परंतु, रविवारच्या जनता कर्फ्यूनंतर सोमवारी वर्धेकर बेफिकीर असल्यागत घराबाहेर निघाल्याचे दिसून आले.कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक वर्धेकराचे सहकार्य सध्याच्या आपातकालीन स्थितीत कर्तव्य बजावणाºया अधिकाºयांना मिळाले नाही तर नागरिकांना घरात बसविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कठोर भुमिका घ्यावीच लागणार असल्याचे सांगण्यात आले.रविवारी जनता कर्फ्यूला वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्पूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, सोमवारी अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांची गर्दी न होऊ देणे तसेच एका नागरिकाचा दुसºया नागरिकासोबत संपर्क न येऊ देणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा कठोर पावले उचलण्यात येईल.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.रविवारी तीन व्यक्तींच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या व देण्यात येत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या