शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

सिंदी (रेल्वे) तालुका निर्मितीचा आमदाराचा प्रस्ताव

By admin | Updated: August 22, 2015 02:33 IST

पुलगावला तालुक्याचा दर्जा द्यावा, ही मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू असताना सिंदी(रेल्वे) ला सुद्धा तालुक्याचा दर्जा द्यावा, ...

महसूल मंत्रालयाकडे प्रकरण पाठविण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचनावर्धा : पुलगावला तालुक्याचा दर्जा द्यावा, ही मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू असताना सिंदी(रेल्वे) ला सुद्धा तालुक्याचा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव गुरुवारी हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे आ. समीर कुणावार यांनी अर्थ व नियोजन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मांडला. यावर ना. मुनगंटीवार यांनी ही बाब महसूलशी संबंधित असल्याचे सांगून सदर प्रस्ताव सदर विभागाकडे पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्या. ना. मुनगंटीवार हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. शासकीय दौऱ्यांच्या अंती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. याप्रसंगी सिंदी(रेल्वे) तालुका निर्मितीचा विषय आधी पासूनच पटलावर होता. या अनुषंगाने आ. समीर कुणावार यांनी सिंदी(रेल्वे)ला नवा तालुका म्हणून का घोषित करावा, ही बाब सविस्तर अहवालाच्या माध्यमातून पटवून दिली. याबाबत मुनगंटीवार यांनी सकारात्मक विचार करीत सदर बाब राज्याच्या महसूल विभागाच्या अखत्यारित येत असल्यामुळे हा प्रस्ताव महसूल विभागाला पाठविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आली.(जिल्हा प्रतिनिधी)पुलगाव तालुक्याची मागणी धूळ खातपुलगावला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी सन १९७८ पासून धूळखात आहे. तब्बल ३७ वर्षानंतर पुलगाव तालुका होईल याची शाश्वती नागरिकांना नाही. त्यामुळे तालुका घोषित करण्याची मागणी होत आहे.गत वर्षी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपाने महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आल्यास तीन महिन्यांत पुलगावला तालुका घोषित करू अन्यथा राजकारण सोडू असे जाहीर केले होते. राज्यात भाजपाची सत्ता येऊन वर्ष उलटले तरी अद्याप कुठलीही हालचाल दिसत नसल्याने जनतेच्या पदरी निराशा आली आहे.देवळी तालुक्यातील २४ गावे, वर्धा तालुक्यातील सात गावे तसेच आर्वी तालुक्यातील काही गावे समाविष्ट होतात. हिंगणघाट तालुक्यातील तीन गावे देवळी तालुक्यात जोडली आहेत. तालुक्यात ४८ गावे आहेत. पुलगाव तालुका झाल्यास यातील अनेक गावे शहरास जोडली जातील. त्यामुळे आजूबाजूच्या अनेक ग्रामस्थांना कामकाजासाठी सोईचे जाईल. तसेच वेळ आणि पैशाचा उपव्यय थांबेल. कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने ते कामाचा भार कमी होईल. परिणामी प.सं. तहसील संबंधातील कामासाठी ताटकळत राहावे लागणार नाही.