शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींमध्ये समस्यांची बजबजपुरी

By admin | Updated: November 2, 2014 22:46 IST

तालुक्यात बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतेचा अभाव असल्याने मलेरिया, डेंग्यू, टाईफाईड, कावीळ या आजाराच्या रूग्णात वाढ झाली आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे

सेलू : तालुक्यात बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतेचा अभाव असल्याने मलेरिया, डेंग्यू, टाईफाईड, कावीळ या आजाराच्या रूग्णात वाढ झाली आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. ब्लिचिंगविना पाण्याचा पुरवठा होत आहे. वृक्षसंवर्धन योजनेचा बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी बोगस मजुरांची प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये समस्यांची बजबजपुरी निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच पहात असला तरी आर्थिक खर्च करण्याचे अधिकार ग्रामसेवकांना असतात. त्यामुळे अनेकदा सरपंचाला हाताशी घेऊन ग्रामसेवकांकरवी आर्थिक व्यवहार केले जातात. त्यामुळे दोघांनाही गावाच्या समस्यांचा विसर पडतो. काही सरपंच सहीपुरतेच असल्याने ग्रामसेवकांची चांगली मज्जा सुरू असल्याचे चित्रही अनेक ग्रामपंचायतमध्ये दिसते पंचायत समिती स्तरावरची यंत्रणा ग्रामसेवकांभोवती फिरत असते. त्यामुळे बरेचदा झालेला भ्रष्टाचार झाकल्या जातो. त्यामुळे ग्रामस्थांना ब्लिचिंगविना दररोज पाणी पिण्याची वेळ आल्याचेही ग्रामस्थांमधून संतापाने बोलल्या जात आहे. गावांतील नाल्यांमध्ये नियमित फवारणी केल्या जात नाही. गोदरीमुक्त योजनेचा फज्जा उडाला असून उघड्यावर घाण दिसते. लोकांनी ओरडूनही उपयोग होत नसल्याचे ग्रामीण भागातील वास्तव आहे. वृक्षलागवड व संवर्धनाचा तर पुरता बोजवारा उडाला आहे. वृक्षसंवर्धनासाठी असणाऱ्या मजुरांना कामाचा मोबदला दिल्या जात असला तरी कधीही कामांवर नसणाऱ्यांची नावे भरून त्यांच्या नावावर मजुरी काढल्या जात असल्याची अनेक प्रकरणे पहावयास मिळतात. बँकेत मजुरांच्या नावे रक्कम जमा होते. त्यामुळे या बोगस मजुरांना काही रक्कम देवून तत्पूर्वीच त्यांचे बँकेचे पासबुक जवळ ठेवून त्यांना सोबत नेवून त्यांच्याच स्वाक्षरीने मजुरीची रक्कम उचलल्या जात असल्याचे वास्तव आहे. प्रशासनाने तालुकास्तरावरील यंत्रंएद्वारे गावांमध्ये जावून बोगस हजेरी रजिस्टर तपासून बोगस मजूरांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. तसेच ग्रामसेवक दोषी आढळल्यास त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे. एकंदरित ग्रामपंचायतकडे तेथील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेचा पर्यायाने आरोग्यव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वृक्षसंवर्धन योहनेचेही तीनतेरा वाजले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गावांतील नागरिकांकडून जोर धरत आहे.(तालुका प्रतिनिधी)