शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्गठनाच्या नावावर शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: June 25, 2016 01:54 IST

शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय घेतला. यात ठराविक रकमेवरील प्रक्रिया शुल्क माफ करण्यात आले.

बँकांकडून कागदपत्रांची मागणी : शासकीय अधिकाऱ्यांकडून अडवणूक वर्धा : शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय घेतला. यात ठराविक रकमेवरील प्रक्रिया शुल्क माफ करण्यात आले. याचा लाभ शेतकऱ्यांना होईल असे वाटले होते. वास्तवात मात्र कर्ज पुनर्गठनाच्या नावावर बँकांकडून शेतकऱ्यांची लुटच होत आहे. पुनर्गठनाच्या एका प्रकरणात शेतकऱ्याला सुमारे सात हजार रुपयांचा भुर्दंड पडत आहे. या खर्चानंतरही त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन होईलच याची शाश्वती नाही. कर्जाच्या पुनर्गठनात अडीच लाखांपर्यंतचे कर्ज प्रक्रिया खर्च मुक्त करण्यात आले आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असला तरी निर्णय जाहीर होण्यापूर्वी शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. कर्जाच्या पुनर्गठनाकरिता आवश्यक कागदपत्र व मुद्रांक खरेदीकरिता शेतकऱ्यांनी रक्कम खर्च केली आहे. ती आता शेतकऱ्यांना परत मिळणे कठीण झाले आहे. आर्थिक अडणचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हा खर्च सहन करण्याची वेळ आली आहे. मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भारवर्धा : कर्जाच्या पुनर्गठणाचा निर्णय झाला त्या काळातच थकीत कर्जदारांना पुनर्गठणाकरिता बँकांच्यावतीने १ हजार ५०० रुपयांचे मुद्रांक घेण्यासंदर्भात कळविण्यात आले. यानुसार शेतकऱ्यांनी बँकेकडून आलेल्या सुचनेनुसार सदर मुद्रांक विकत घेत बँकेत गोळा केले. अशात अडीच लाख रुपयांचे कर्ज दंडमुक्त करण्यात आल्याने बँकांकडून या अटीत बसत असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे मुद्नांक परत केले. आता या मुद्रांकाचे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाने अडीच लाख रुपयांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठण करताना त्यावर लावण्यात आलेला दंड माफ केला. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, असे असले तरी हा आदेश जाहीर करताना विलंब झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ कमी व नुकसान अधिक झाल्याचा आरोप काही शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.(प्रतिनिधी) अधिकाऱ्यांकडूनही कागदपत्रांसाठी अडवणूक पीक कर्जाच्या पुनर्गठणाकरिता शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची गरज आहे. यात सातबारा, नकाशा, चर्तुसिमा आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. मात्र ही कागदपत्रे गोळा करण्याकरिता शेतकऱ्यांची शासकीय अधिकारी व कर्मवाऱ्यांकडून अडवणूक होत आहे.