शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी घ्या २०० रूपये ड्रम; वर्धा जिल्ह्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:08 IST

उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढत आहे तसतशी पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू आहे.

ठळक मुद्देथार येथील पाणीटंचाई एकाच विहिरीवरुन गावाला होतोय पाणीपुरवठा

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढत आहे तसतशी पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरू आहे. थार गावात पाणीपुरवठ्यासाठी १२ बैलबंड्या तयार करण्यात आल्या असुन २०० रुपये प्रति ड्रमने पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे. पण, प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.डोंगरमाथ्यावर असलेल्या थार गावाचा डार्क झोनमध्ये समावेश आहे. याठिकाणी हरियाली, एकात्मीक पाणलोट व्यवस्थापन, जलयुक्त शिवार अभियान, जिल्हा वार्षीक योजना, सामाजिक वाणीकरण यासारख्या विविध योजनेमधून कामे करण्यात आली. मात्र जमिनीची रचना कडक स्वरूपाची असल्याने खडकाळ व दगडी भागाचा पट्टा कायम आहे. पावसाळ्यात होणारे जलव्यवस्थापन येथे शंभर टक्के असफल झाले आहे. जानेवारी महिण्यापासून भूगर्भातील पाण्याचा भाग खोलवर गेला आहे. नैसर्गीक स्त्रोत संपल्यामुळे येथे कृत्रिम पाणी व्यवस्थापनावर भर दिल्या जाते. येथे शासनाच्या कुठल्याही योजनेची प्रबळ अंमलबजावनी करण्यात आली नाही. परिणामी आज पिण्याचे पाणी, वापराचे पाणी, जनावरांचे पाणी कुठेही दिसत नाही. गावाच्या वेशीवर एकमेव सार्वजनिक विहीर आहे. यामध्ये थोडाफार साठा दिवसाला संचयित होतो. त्यामधून गावातील नागरिक आपली तहान भागवत होते. तीही विहीर कोरडी झाल्याने गावकरी दुरवरुन पाणी आणतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीफार ठीक आहे. असे नागरिक २०० रुपये प्रति ड्रम या दराने पाणी विकत घेऊन घरातील कामधंदा आणि तृष्णातृप्ती करुन आपली निकड भागवित आहे.गावात इतकी भीषण पाणीटंचाई असताना ग्रामपंचायतने टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यासंदर्भात अद्याप प्रस्तावच पाठविला नसल्याची धक्कादायक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.ग्रामपंचायतकडून टँकरबाबत काहीही पाठपुरावा केला नसल्याने गावात ही पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. पाण्याअभावी गावातील दोन हजारावर जनावरांनी दुसरीकडे स्थलांतर केले आहे. या परिसरात दही, ताक, तुप व दुध या स्रिग्ध पदार्थाचे भरपूर उत्पादन घेतले जाते. यावर्षी पाणी आणि चारा टंचाई निर्माण झाल्याने जनावरांना जगविण्याची मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे गोपालकांनी गाव सोडले आहे. आता नागरिकांनाही पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाल्याने गाव सोडण्याची वेळ आली आहे. सामान्य परिवार पाणी विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे थार या गावातील पाण्याची भीषणता लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

ग्रामपंचायतचे विकासकामात लक्ष नाही. केवळ राजकारण करून ग्रामस्थांना वेठीस धरून सामान्य नागरिकांना पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर खस्ता खाव्या लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा न केल्यास गावकऱ्यांसह आंदोलन करणार.- राजकुमार निस्वादे, माजी सरपंच, थार

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई