शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

२५० महाविद्यालयांना प्रवेश बंदचे आदेश

By admin | Updated: July 29, 2014 23:57 IST

नागपूर विद्यापीठात येणाऱ्या २५० महाविद्यालयांना विविध कारणांनी प्रवेश बंदचे आदेश देण्यात आले आहेत़ यात वर्धा जिल्ह्यातील महाविद्यालयांचाही समावेश आहे़ ग्रामीण भागातील महाविद्यालयांची मान्यता

विद्यापीठ व शासनाच्या जाचक अटी : जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचितवायगाव (नि़) : नागपूर विद्यापीठात येणाऱ्या २५० महाविद्यालयांना विविध कारणांनी प्रवेश बंदचे आदेश देण्यात आले आहेत़ यात वर्धा जिल्ह्यातील महाविद्यालयांचाही समावेश आहे़ ग्रामीण भागातील महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली़ काही महाविद्यालयांत प्रवेश क्षमता कमी असल्याने असंख्य विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे़ वर्धा जिल्ह्यात ९७ महाविद्यालये आहेत़ शहरी भागात शाळा अधिक असल्या तरी विद्यार्थ्यांचा ओढाही अधिकच आहे. अनेक महा़चे प्रवेश पूर्ण झाल्याने उर्वरित विद्यार्थी कुठे जातील, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ नागपूर विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना पुर्वसूचना न देता २५० महाविद्यालयांना मागील वर्षी प्रवेश बंद करण्याचे आदेश दिलेत़ निर्धारित नियमानुसार वर्गनिहाय तुकडी वाढविली गेली तर वाढणाऱ्या तुकडीसाठी टप्प्याने १०० टक्के प्राध्यापकांची नियुक्ती झाली पाहिजे, ही अट आहे. पैकी ५० टक्के प्राध्यापक ५ आॅगस्टपूर्वी भरले पाहिजे तर उर्वरित ५० टक्के प्राध्यापक तीन महिन्यांच्या आत भरण्याचे आदेश आहेत़ या आदेशावर अंमल करण्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापणास कसरत करावी लागत आहे. प्राध्यापकांची नियुक्ती करताना नेट-सेट आणि पीएचडीधारक प्राध्यापकांना वेतन द्यायचे कुठून, असा प्रश्न संस्था व्यवस्थापकांना पडला आहे.व्यवस्थापनाने तात्पुरत्या स्वरुपात प्राध्यापकांची नियुक्ती केल्यास त्या शिक्षकांना तीन महिन्यानंतर रितसर समाविष्ट करता येईल; पण ५ ते १० हजारांत नेट-सेट, पीएचडीधारक प्राध्यापक मिळणार कुठे, हा प्रश्न संस्थांना आव्हान ठरत आहे़ प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वाजवी शुल्क घेणेही बंधनकारक केले आहे़ यामुळे प्राप्त शुल्कातूनही प्राध्यापकांना वेतन देणे शक्य नाही. या जाचक अटींमुळे महाविद्यालयाच्या प्रवेश क्षमतेनुसारच प्रवेश घेतले जातील, अशी मानसिकता संस्थानिकांची आहे़ यामुळे अनेक विद्यार्थी अडचणीत आले आहेत़ ग्रामीण भागातील काही महाविद्यालये आदेशाचा मान ठेऊन बंद करण्यात आलीत़ याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. ग्रामीण भागातील विशेषत: मुलींना घरातील मंडळी शहरात शिक्षणासाठी पाठविण्यास तयार होत नाही़ यामुळे त्यांच्यावर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. बहुतांश विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमापासून वंचित राहणार आहे़ विद्यापीठाच्या निर्णयाचा फटका बसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात दिसते़(वार्ताहर)