शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

नळाच्या पाण्यात नारू

By admin | Updated: March 31, 2016 02:44 IST

गत कित्येक महिन्यांपासून सेलसुरा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसह पाण्याच्या टाकीत ग्रा.पं. कर्मचारी ब्लिचिंग पावडर टाकत नाही.

आरोग्य धोक्यात : सेलसुरा पाणी पुरवठा योजनेतील प्रकार
वायगाव (नि.) : गत कित्येक महिन्यांपासून सेलसुरा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसह पाण्याच्या टाकीत ग्रा.पं. कर्मचारी ब्लिचिंग पावडर टाकत नाही. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली; पण कारवाई झाली नाही. आता नळाच्या पाण्यात नारूसदृश कृमी येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सेलसुरा या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनेच्या विहीर व टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकले जात नाही. ग्रा.पं. चा शिपाई दिरंगाई करीत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय पाईप-लाईनही अनेक ठिकाणी फुटलेली आहे. यामुळे नळाद्वारे दूषित पाणी येत आहे. याबाबत ग्रामस्थांनी १० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या; पण कुणीही याकडे लक्ष दिले नाही. यामुळे गावात विविध आजारांचा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे.
एक वर्षापासून मुख्य पाईप लाईन फुटलेली असताना दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. लेखी तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने सार्वजनिक आरोग्याचे कुणालाही सोयरसुतक नाही काय, असा प्रश्न सेलसुरा येथील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.(वार्ताहर)

फुटलेल्या पाईपकडेही दुर्लक्ष
सेलसुरा येथील ग्रामस्थांना गत कित्येक दिवसांपासून अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. आता नळातून नारूसदृश्य कृमी येत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गत एक वर्षापासून गावातील पाईपलाईन लिकेज आहे. याबाबत तक्रारीही करण्यात आल्या; पण अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, नळातून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.
ग्रामपंचायतचा शिपाईदेखील पाणी पुरवठ्याची विहीर आणि टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकत नाही. गत सहा महिन्यांपासून पाणी शुद्ध करण्यासाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. याबाबतही गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या; पण कारवाई झाली नाही. सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष देणे अधिकाऱ्यांचे कर्तव्य नाही काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.