शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमातील सूत कताईतून अनेकांना मिळतोय रोजगार

By admin | Updated: June 23, 2016 01:43 IST

गांधीजींनी आपल्या जीवनात सूतकताईला विशेष महत्व दिले. खादी वस्त्र नसून तो विचार, स्वावलंबन आणि

सेवाग्राम : गांधीजींनी आपल्या जीवनात सूतकताईला विशेष महत्व दिले. खादी वस्त्र नसून तो विचार, स्वावलंबन आणि रोजगाराचे प्रमुख माध्यम मानले. यातूनच चरखा हे स्वातंत्र्याचे प्रतिक बनले. आश्रमात गांधी जयंती आणि पुण्यतिथीला अखंड सूत्रयज्ञ करून बापूंना आदरांजली वाहिली जाते. पण आश्रम व्यवस्थापकांनी अंबर चरख्याच्या माध्यमातून नियमित कताई व रोजगार निर्माण करून बापूंच्या विचारांना प्रत्यक्ष साकार करण्याचे काम सुरू केले. आश्रम परिसरातील महादेवभाई देसाई यांच्या निवासस्थानी सूत कताई केंद्र सुरू करण्यात आले. सध्या या ठिकाणी आठ तकब्यांचे सात अंबर चरखे सुरू असून सात जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. दिवसाला एक महिला ३० ते ३५ गुंड्या काढते. प्रती गुंडी चार रूपये असा दर आहे. सामान्यपणे घरची कामे संपवून एक महिला १२५ ते १५० रू. रोज सहजपणे सध्या प्राप्त करू शकत आहे. सेवाग्राम येथे रोजगाराची अनियमितता आहे. त्यामुळे आश्रमातील सूत कताई केंद्राने सुरू केलेल्या कताई केंद्राचा महिलांना आधार आहे. तसेच बापूंच्या कार्याला पुढे नेण्याचे कामही यामुळे होत आहे. आतापर्यंत महात्मा गांधींची जयंती व पुण्यतिथीलाच सूत कताई करून त्यांचे बापूंचे व्यायचे. पण आता ३६५ दिवस सूत कताईतून बापंूचे सदैव स्मरण केल्या जाते आहे. आश्रमात येणाऱ्या पर्यटक व अभ्यासकांना सूतकताईचे महत्व व ग्रामीण अर्थशास्त्राची माहिती यामुळे मिळत आहे.(वार्ताहर) गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमातील एक मुख्य भाग हा कताईचा होता. खादीला १०० वर्षे पूर्ण झाली झाली आहेत. सूतकताई उपक्रमाचा विस्तार करायचा आहे. कापड तयार करून विक्रीस ठेवण्यात येणार असून यातून रोजगार निर्मिती होत आहे.- जयवंत मठकर, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.सूतकताई नियमित सुरू असून प्रतिसाद चांगला आहे. महिलांना यातून रोजगार प्राप्त झाला आहे. - शेरखॉँ पठाण, व्यवस्थापक, सूतकताई .